2-4 दलाल पळून गेले बाकी सगळे ठाकरेंसोबत, संजय राऊत यांनी सांगितलं

| Updated on: Dec 25, 2022 | 10:24 PM

शिवसेना सोडून गेले कोण. कुणीचं गेले नाहीत. दोन-चार दलाल गेले असतील.

2-4 दलाल पळून गेले बाकी सगळे ठाकरेंसोबत, संजय राऊत यांनी सांगितलं
संजय राऊत
Follow us on

नवी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या शाखेचं उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, सगळ्याचं गोष्टी पैशानं किंवा खोक्यानं विकत घेता येत नाही. समोर बसलेले आहेत ते खरे शिवसैनिक आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात बीज भरविल्याचं विजय शिवतारे म्हणाले होते. तुझं नशिब फुटलं आहे. तू फुटला नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. मी संजय असल्यानं मला माहीत आहे, कुठं काही चाललंय.

संजय राऊत म्हणाले, शिवसैनिक, महिलाआघाडी, तरुण सगळे जागेवर आहेत. हे वातावरणातून दिसून येते. शिवसेना सोडून गेले कोण. कुणीचं गेले नाहीत. दोन-चार दलाल गेले असतील.

घाबरून पळपुटे गेलेत. आमचं सरकार आलं तर ते पळपुटे इकडंच असणार. अर्ज घेऊन ते आमच्याकडं येणार. शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे. जनता याचं शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या शाखेचं उद्घाटन झालं. यावेळी संजय राऊत म्हणाले, शिवसेना एकच आहे.ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीचं काम करते. बाकी कुणाचे गट झाले असतील, तर तो त्यांचा प्रश्न.

एका शाखेचं उद्घाटन केलं. खासदार राजन विचारे आहेत. संपर्कप्रमुख निलेश पराडकर आहेत. सगळे पदाधिकारी जागेवर आहेत.
कडवट शिवसैनिक आहेत. तोपर्यंत शिवसेनेचा कोणी बाले बाका करू शकत नाहीत. हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. यांच्याच जोरावर ही शिवसेना पुढं जाईल.