Aditya Thackeray in Pune | कोरोना काळातही विकास काम थांबली नाहीत; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात – आदित्य ठाकरे

| Updated on: Dec 25, 2021 | 4:57 PM

महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोरोनाच्या आधीचा काळ असेल किंवा कोरोना काळात विकास काम कुठेही थांबलेली नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री सर्वचजण चांगले काम करत आहेत.

Aditya Thackeray in Pune | कोरोना काळातही विकास काम थांबली नाहीत; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray
Follow us on

पुणे – जे काही असत ते शिवसेनेच खुलं असतं.  गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे चांगलं काम करत आहेत. महानगरपालिका , जिल्हा परिषदेच्या निवडणूका अजून जाहीर झाल्या नाहीत, लवकरच त्या जाहीर होतील. पण येत्या काळातही एकत्र लढावं असे आम्हाला वाटत, असे मत पर्यावरण  मंत्री आदित्य ठाकरें यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना व्यक्त केले आहे.

 विकास काम कुठेही थांबलेली नाहीत.

कोरोनामुळे बरेच दिवस कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटता आले नव्हते. कोरोना नियमावलीचे पालन करत असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेणे शक्य नव्हते. कोरोनाच्या केस कमी झाल्यानंतर आणि पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याच्या आगोदर पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. कारण कोरोना काळात पदाधिकाऱ्यांनी अंत्यत चांगले काम केले आहे. त्याच्या काही संकल्पना ऐकण्यासाठी ही बैठा घेण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली . महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोरोनाच्या आधीचा काळ असेल किंवा कोरोना काळात विकास काम कुठेही थांबलेली नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री सर्वचजण चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले.

ओमीक्रॉनचा धोका वाढतोय काळजी घ्या
ओमीक्रॉनचा धोका वाढत आहे. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करत नाताळ , नवीन वर्ष हे फेस्टीव्हल साजरे करावेत. नागरिकांनी मास्कचा वापार कंपल्सरी करावा. लसीकरण झाले आहे की नाही हे तपासून नागरिकांनी जर लसीकरण झाले नसेल तर लसीकरण करून घ्यावं असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

कर्नाटकच्या घटनेवरून विरोधकांवर टीका
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विंटबनेच्या घटनेनंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे. माफी मागायची असेल तर त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला दूधाचा अभिषेक करावा आणि नतमस्तक व्हावं. असे ठाकरे यांनी व्यक्त केल. हे सांगत असतानाच त्यांनी विरोध पक्ष याबाबतीत चकार बोलत नाही. दुसऱ्याचा विषयावर विरोध बोलतात अशी टीका भाजपवर केली.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 25 December 2021

Rajesh Tope UNCUT PC | सण, नववर्षांचं स्वागत निर्बंध लक्षात ठेवून करावं : राजेश टोपे

WhatsApp प्रोफाइल ठराविक लोकांपासून कशी लपवणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस