AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : ‘अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत’, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

"अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलंय.

Pune : 'अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत', जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य
जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Feb 03, 2023 | 9:13 PM
Share

पुणे : “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलंय. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन बघा, किती उत्साहाचे वातावरण असते. मुसलमान वस्तीत उत्साह असतो. त्यांच्या मनात भीती असते अस्तित्वाची. त्यांना सिद्ध करावं लागतं की ते भारतीय आहेत किती वर्ष त्यांच्याकडे पुरावा मागणार?”, असा सवाल त्यांनी केला.

“त्यांनी पुरावा दिला ना, जिना यांनी पाकिस्तान काढला आणि यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानात नाही येणार हा आमचा देश आहे. त्यांना कसले कागदी पुरावे मागत आहेत? त्यांनी पुरावा दिला आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“महाराष्ट्रात वृत्तपत्रावर बंदी येत आहे. टीव्ही चॅनल विकत घेतली जात आहेत. खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत येऊच दिल्या जात नाहीत. भारत जोडो यात्रेच कवरेज दिलं नाही. पण सोशल मीडियाने या मिडियाची वाट लावली”, असं आव्हाड म्हणाले.

“काँग्रेस नेते राहुल गांधी घराघरात पोहोचले. राहुल गांधी यांच्याकडे बघितलं की असं वाटतं गांधी कभी मरते नहीं. देश चालवायला एक नेता लागतो”, असंदेखील आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काय म्हणाले?

“हे व्यासपीठ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालं आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर हे सूत्र उद्ध्वस्त करण्याचं काम काही लोक करत आहेत. हा सगळा सांस्कृतिक दहशतवाद आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

“अजित पवार छत्रपती संभाजी राजेंना काय म्हणाले? यावर महाराष्ट्र पेटला आणि मग आम्हाला सांगावं लागलं की दादोजी कोंडदेव महाराजांचा गुरू नव्हता, असा दावा त्यांनी केला.

“Francis Martin याने संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीतरी लिहून ठेवलंय. मला नवा वाद उकरून काढायचा नाही म्हणून इथेच थांबतो. पण संभाजी महाराजांना कुणी मारले?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“स्वतःच्या घरात जर गद्दारी झाली तर काय करणार माणूस? जसं संभाजी महाराज यांना समजायला लागलं तसं शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील लोकांची डोकी फिरायला लागली. संभाजी महाराज आणि अष्टमंडळ यांच्यात गैरसमज झाले”, असं आव्हाड म्हणाले.

“कुठल्याही इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे कारण सांगता आले नाही. मोरोपंत पिंगळे यांच्या जागेवर संभाजी महाराज यांनी विवोपंत यांना पद दिलं”, असं आव्हाड म्हणाले.

“औरंगजेब आणि राजपूत यांच्यात भांडणं व्हायला लागली. संभाजी महाराज आग्राला होते तेव्हा अकबर आणि संभाजी यांची भेट झाली. अकबरला वाटले संभाजी महाराज मला औरंगजेबपासून वाचवतील”, असं आव्हाड म्हणाले.

“शिकलेले सवरलेले संभाजी महाराज शिवाजी महाराजांपेक्षा चांगले राजे झाले असते”, असं मत त्यांनी मांडलं.

“वटपौर्णिमेला सात फेरे घालण्यापेक्षा घरात महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा फोटो लावा. आपण आपला देश हिंदू-पाकिस्तान करत आहोत. हे आपल्याला कळतच नाही. हिंदू जन आक्रोश काढायला आपला हिंदू घाबरला आहे का?”, असा सवाल त्यांनी केला.

“पहिली शिवजयंती महत्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली. रायगडावरील महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली”, असं आव्हाडांनी सांगितलं.

“टिळकांचा आणि शाहू महाराजांचा वाद सुरू झाला. पण पुणेकारांनो लक्षात ठेवा FC कॉलेज टिळकांनी नाही आणलं तर त्याला जागा शाहू महाराजांनी दिली”,  असं आव्हाड म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.