आनंदाची बातमी: पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ

| Updated on: Aug 15, 2021 | 10:53 AM

Pune Air Service | दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

आनंदाची बातमी: पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ
पुणे विमानतळ
Follow us on

पुणे: पुण्यातून आता देशातील 21 शहरांसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान सुटेल. अमृतसरसाठी 20ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी 21 ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल.

तर दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (Nanded to Mumbai Ahmedabad jalgaon daily flight, Minister Ashok Chavan efforts)

नांदेबरोबरच जळगाव आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिलीय.

या जिल्ह्यांना विमानसेवेचा फायदा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता मुंबईत पोहोचेल.

विमानाचं टाईमटेबल…

मुंबईतून 1 वाजून 25 मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर 7 वाजून 5 मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

नांदेडकरांनी मानले अशोक चव्हाण यांचे आभार

नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेने दररोज मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना आता आठ ते दहा तासांचा प्रवास करावा लागणार नाही. जर मुंबईत कोणतंही शासकीय काम असेल वा खासगी काम असे तर अगदी दोन तासांत नांदेडवरुन व्यक्ती मुंबईत येऊ शकतात. पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेली विमानसेवेने नागरिक सुखावले आहे. समस्त नांदेडकरांनी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.