AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : “राज ठाकरे रामाचे गुन्हेगार, मला कधी भेटले नाही, नाहीतर दोन हात झाले असते”, बृजभूषण सिंहांचं पुन्हा आव्हान

राज ठाकरे मला कधी विमानतळावर भेटले नाहीत नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल चढवाल आहे. तसेच राज ठाकरे हे प्रभु रामाचे गुन्हेगार आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे रामाचे गुन्हेगार, मला कधी भेटले नाही, नाहीतर दोन हात झाले असते, बृजभूषण सिंहांचं पुन्हा आव्हान
भाजप खासदाराची राज ठाकरेंवर टीकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 4:51 PM

अयोध्या : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील एका खासदाराचं नाव गाजतंय. कारण उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (Ayodhya Visit) कडाडून विरोध केला, तसेच राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील नागरिकांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा पवित्रा सध्या त्यांनी घेतला आहे. मागेच त्यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं, तसेच त्यानंतर सभा घेत राज ठाकरेंना थेट विरोध दर्शवला. आता पुन्हा त्यांनी राज ठाकरेंवर कडाकडून टीका केली आहे. तसेच राज ठाकरे मला कधी विमानतळावर भेटले नाहीत नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल चढवाल आहे. तसेच राज ठाकरे हे प्रभु रामाचे गुन्हेगार आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

बृजभूषण यांच्या समर्थनार्थ बॅनर

उत्तर भारतीय हे भगवान रामाचे वंशज आहेत. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांचा अपमान हा रामाचा अपमान आहे. त्यामुळे राज ठाकरे भगवान श्रीराम यांचे अपराधी आहेत. असे ते म्हणाले आहेत. तर बृजभूषण सिंग यांच्या समर्थनात बॅनरही लगले आहेत. 5 जून आयोध्या चलो, राज ठाकरे वापस  जावो, असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. राज ठाकरेंशी माझी काही दुश्मनी नाही. तसेच माझं काही नुकासान करण्याची त्यांची हिंमत नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच माझी इच्छा होती की ते एकदिवस विमानतळावर मला भेटावे मात्र कधी भेटले नाही, नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय.

मनसेचं मौन कायम

तसेच राज ठाकरेंना आयोध्यामध्ये पाय ठेवू देणार नाही. जर वरून आले तर हनुमानजी वरून उचलून घेतील. माझ्या गावामध्ये 300 लोक पीडित आहे जेव्हा मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. एक मिश्रा फॅमिलीला ट्रेनमध्ये बदडून त्यांची हत्या केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच गरोदर महिलांना जबरदस्ती ट्रेनमध्ये बसून ठेवलं त्यांच्यावर उपचार होऊ दिले नाहीत. त्यामुळे ही त्यांची धार्मिक यात्रा नाही. त्यांची राजकीय यात्रा आहे. हिंदू-मुस्लीम सर्वजण अयोध्यामध्ये एकत्र आलेला आहे त्यांच्याविरोधात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणावर मनसे मात्र अद्याप मौन बाळगून आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.