AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : “राज ठाकरे रामाचे गुन्हेगार, मला कधी भेटले नाही, नाहीतर दोन हात झाले असते”, बृजभूषण सिंहांचं पुन्हा आव्हान

राज ठाकरे मला कधी विमानतळावर भेटले नाहीत नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल चढवाल आहे. तसेच राज ठाकरे हे प्रभु रामाचे गुन्हेगार आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे रामाचे गुन्हेगार, मला कधी भेटले नाही, नाहीतर दोन हात झाले असते, बृजभूषण सिंहांचं पुन्हा आव्हान
भाजप खासदाराची राज ठाकरेंवर टीकाImage Credit source: TV9 Marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 15, 2022 | 4:51 PM
Share

अयोध्या : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील एका खासदाराचं नाव गाजतंय. कारण उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (Ayodhya Visit) कडाडून विरोध केला, तसेच राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील नागरिकांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा पवित्रा सध्या त्यांनी घेतला आहे. मागेच त्यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं, तसेच त्यानंतर सभा घेत राज ठाकरेंना थेट विरोध दर्शवला. आता पुन्हा त्यांनी राज ठाकरेंवर कडाकडून टीका केली आहे. तसेच राज ठाकरे मला कधी विमानतळावर भेटले नाहीत नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल चढवाल आहे. तसेच राज ठाकरे हे प्रभु रामाचे गुन्हेगार आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

बृजभूषण यांच्या समर्थनार्थ बॅनर

उत्तर भारतीय हे भगवान रामाचे वंशज आहेत. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांचा अपमान हा रामाचा अपमान आहे. त्यामुळे राज ठाकरे भगवान श्रीराम यांचे अपराधी आहेत. असे ते म्हणाले आहेत. तर बृजभूषण सिंग यांच्या समर्थनात बॅनरही लगले आहेत. 5 जून आयोध्या चलो, राज ठाकरे वापस  जावो, असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. राज ठाकरेंशी माझी काही दुश्मनी नाही. तसेच माझं काही नुकासान करण्याची त्यांची हिंमत नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच माझी इच्छा होती की ते एकदिवस विमानतळावर मला भेटावे मात्र कधी भेटले नाही, नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय.

मनसेचं मौन कायम

तसेच राज ठाकरेंना आयोध्यामध्ये पाय ठेवू देणार नाही. जर वरून आले तर हनुमानजी वरून उचलून घेतील. माझ्या गावामध्ये 300 लोक पीडित आहे जेव्हा मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. एक मिश्रा फॅमिलीला ट्रेनमध्ये बदडून त्यांची हत्या केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच गरोदर महिलांना जबरदस्ती ट्रेनमध्ये बसून ठेवलं त्यांच्यावर उपचार होऊ दिले नाहीत. त्यामुळे ही त्यांची धार्मिक यात्रा नाही. त्यांची राजकीय यात्रा आहे. हिंदू-मुस्लीम सर्वजण अयोध्यामध्ये एकत्र आलेला आहे त्यांच्याविरोधात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणावर मनसे मात्र अद्याप मौन बाळगून आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
"लोकशाही अमान्य असलेले पळपुटे"
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल:
शिंदे गटाची धाकधूक वाढली; कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला...
शिंदे गटाची धाकधूक वाढली! कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला सुरुवात, कोर्टात काय काय घडतंय?
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?