कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, हा कुठला न्याय ? उदयनराजे यांच्यानंतर संभाजीराजेही संतापले…

| Updated on: Dec 02, 2022 | 3:32 PM

पुणे येथे आज राज्यपाल यांचा दौरा होता, त्याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला होता.

कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, हा कुठला न्याय ? उदयनराजे यांच्यानंतर संभाजीराजेही संतापले...
Image Credit source: Google
Follow us on

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील वातावरण चिघळण्याच्या मार्गावर आहे. उदयन राजे यांनी थेट मुंडकी उडवण्याची भाषा केली आहे. तर दुसरींकडे सांविधानिक पद्धतीने राज्यपाल यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी गेलेल्या स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याने संभाजीराजे छत्रपतीही संतापले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत आक्रमक भूमिका मांडली आहे. ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हंटले आहे, राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ? “स्वराज्य”चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले..म्हणून स्वराज्य च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत ? आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे ? अशा आशयाचे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

पुणे येथे आज राज्यपाल यांचा दौरा होता, त्याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला होता.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचचा या घोषणेखाली निषेध व्यक्त करत असतांना स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

एकूणच याच मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत या कारवाईचा एकप्रकारे निषेध व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित करत राज्यपाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यपाल यांच्या विधानावरून दोन्हीही राजे आक्रमक झाल्याने राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे राज्यपाल यांना पदमुक्त करतात का ? की राज्यपाल माफी मागतात ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.