शितल म्हात्रे यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन संजय राऊत यांनी कुणाला सुनावलं? संजय राऊत यांनी दिलेलं आव्हान काय ?

| Updated on: Jan 31, 2023 | 11:29 AM

जे पळून गेले यांचा पार्श्वभाग सुजवून काढा असे शितल म्हात्रे म्हणाल्या होत्या. नंतर गुवाहाटीला जाऊन मिळाल्या असं म्हणून राऊत यांनी शीतल म्हात्रे यांना डिवचलं आहे.

शितल म्हात्रे यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन संजय राऊत यांनी कुणाला सुनावलं? संजय राऊत यांनी दिलेलं आव्हान काय ?
Image Credit source: Google
Follow us on

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान देत खुलासा करण्याची मागणी करत असतांना शीतल म्हात्रे यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ दिला आहे. शिंदे गटाने एकदा स्पष्ट अकरावे कीम ते शिवसेना सोडून का गेले, त्यांना महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले का ? हिंदुत्वासाठी सोडून गेले का ? खोके मिळाले म्हणून सोडून गेले का ? धमक्यांना घाबरून गेले? प्रत्येक वेळी भूमिका बदलतात म्हणून एकदा स्पष्ट करावे असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. यावेळी बोलतांना दहिसर येथील भाषणाचा आधार घेत शीतल म्हात्रे यांनी गुवाहाटीला जे पळून गेले होते त्यांना दंडुक्याने मारा, त्यांच्या पार्श्वभगावर पठके द्या असं शीतल म्हात्रे म्हणाल्या होत्या याबद्दलही संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत असतांना शीतल म्हात्रे यांना डिवचलं आहे. यावेळी त्यांनी संजय गायकवाड यांच्या टिकेबद्दल विचारतांना फालतू लोकांवर बोलत नाही म्हणून बोलणं टाळलं आहे.

शिंदे गटाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, लाठ्या मारा, त्यांना दंडुक्याने झोडपून काढा असं शीतल म्हात्रे म्हणाल्या होत्या असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

शिंदे गटाने स्पष्ट करावे की ते का सोडून गेले ? त्यांना महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले का? ते हिंदुत्वासाठी सोडून गेले, की खोके मिळाले म्हणून सोडून गेले. ते प्रत्येक वेळी भुमिका बदलतात.

हे सुद्धा वाचा

ते माझ्या ज्या भाषणाचा उल्लेख करतात ते माझे भाषण गुवाहाटीला गेल्यावरचे आहे. ते जरा व्यवस्थित ऐका म्हणा असाही पलटवर राऊत यांनी म्हात्रे यांच्यावर केला आहे.

जे पळून गेले यांचा पार्श्वभाग सुजवून काढा असे शितल म्हात्रे म्हणाल्या होत्या. नंतर गुवाहाटीला जाऊन मिळाल्या असं म्हणून राऊत यांनी शीतल म्हात्रे यांना डिवचलं आहे.

संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी बोलत टाळत फालतू लोकांवर बोलायला मी बांधिल नाही. आमची भुमिका आम्ही काल स्पष्ट केली आहे असंही राऊत यांनी आमदार संजय गायकवाड यांना टोला लगावला आहे.

आम्ही अदाणीच्या विचाराने चालत नाही, आज देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी येतो. घोषणा खूप असतात. इतकीच अपेक्षा आहे की दोन पाच जणांना पुढे ठेवून हा अर्थसंकल्प तयार होवू नये.

सर्वसामान्यांना डोळ्यापुढे ठेवून बनवला तर स्वागत असेल. नाही तर राहूल गांधी म्हणतात तसे दोघांसाठी ही अर्थव्यवस्था राबवली जात असेल तर हा देश खड्यात जाईल आणि जात आहे. शी टीका संजय राऊत यांनी बजेटवर केली आहे.