AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळजाभवानी आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, तुम्हीही करू शकता वनडे ट्रिप

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असुन हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्माची पवित्र धार्मिक स्थळे आणि लेणी, किल्ले असे वैभव या जिल्ह्यात आहे. सुट्टी व नववर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानी दर्शन आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असून हे ठिकाण उस्मानाबाद पासून 24 तर सोलापूर […]

तुळजाभवानी आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, तुम्हीही करू शकता वनडे ट्रिप
| Edited By: | Updated on: Dec 26, 2020 | 11:42 PM
Share

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असुन हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्माची पवित्र धार्मिक स्थळे आणि लेणी, किल्ले असे वैभव या जिल्ह्यात आहे. सुट्टी व नववर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानी दर्शन आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असून हे ठिकाण उस्मानाबाद पासून 24 तर सोलापूर पासून 45 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर आहे. (tourists Crowds to see Tulja Bhavani and Naldurg Fort you can also do a one day trip)

सोलापूर, उस्मानाबाद इथं रेल्वे स्थानक आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील अनेक जणांनी कुलदैवत आहे. त्यामुळे नेहमीच इथे भाविकांची गर्दी असते. तुळजापूर येथे मंदिर संस्थानचे विश्रामगृहसह खासगी हॉटेल आहेत. ज्याचा एक दिवसाचा दर 1 हजार ते दीड हजार आहे. तुळजापूर येथील उस्मानाबादी शेळीचे मटन व त्यातील अनेक पदार्थ हे ख्याव्यासाठी मेजवानी आहेत. विशेष म्हणजे तुळजापूर येथे हळद कुंकू, माळ आणि परडी घेण्यासाठी भाविक येतात.

भुईकोट किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

तुळजापूर येथे आल्यावर भाविक नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला पाहायला जाऊ शकतात. तुळजापूर ते नळदुर्ग हे अंतर 40 किमी असून नळदुर्ग किल्ला हा युनिटी मल्टीकॉन या संस्थेने विकसित केला आहे. या किल्ल्याच्या मध्यभागातून बोरी नदी वाहते. यावर नर- मादी हे धबधबे आहेत. जे नेहमी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. या ठिकाणी किल्ल्यात बोटींग व ऍडव्हेंचर स्पोर्टची व्यवस्था आहे.

युनी वंडर्स रिसॉर्ट

नळदुर्ग किल्ल्याच्या शेजारी युनिटी या समूहाचे नदी शेजारी युनी वंडर्स रिसॉर्ट असून इथे हट स्वरूपाचे निवासी व्यवस्था निसर्गरम्य ठिकाणी आहे. या किल्ल्याच्या नदी शेजारी असलेल्या 8 एकर जागेतील रिसॉर्टमध्ये राहण्याची उत्तम सोय असून रात्री शेकोटी पेटवून, संगीत रजनीसह पार्टीची व्यवस्था आहे. प्रति व्यक्ती 1 ते 2 हजार असे राहण्याचे आणि जेवण पॅकेज आहे. या रिसॉर्टवर रात्री छोट्या पार्टी आणि कौटुंबिक संमेलन सुद्धा आयोजित केले जातात. नळदुर्ग किल्ल्यात अनेक मराठी, तेलगू गाण्यासह चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे अनेक जण येथे फोटोसेशन व फोटोग्राफी करण्यासाठी प्राधान्य देतात.

अणदूर गावातील खंडोबा मंदिर

नळदुर्ग पासून अवघ्या 3 किमी अंतरावर अणदूर हे गाव आहे. या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे. खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह इथे झाल्याच्या अख्यायिका आहे. त्यामुळे तुळजाभवानी, खंडोबा दर्शन आणि नळदुर्ग किल्ला असे एका दिवसात फिरणं सहज शक्य आहे. त्यामुळे पर्यटक या स्थळांना जास्त पसंती देतात.

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा दर्गा

उस्मानाबाद शहरात हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा दर्गा आहे. हा दक्षिण भारतातील सर्वात मोठे घुमट असलेला दर्गा असून अजमेरनंतर या दर्ग्याला विशेष महत्व आहे. तसेच उस्मानाबाद येथे जैन आणि बौद्ध धर्माच्या लेणीही आहेत. त्या शहरापासून 4 किमी अंतरावर आहेत. अजिंठा वेरूळ लेण्यापूर्वी या ठिकाणी लेण्या खोदण्यात आल्या होत्या. मात्र, सच्छिद्र दगड लागल्याने त्या अर्धवट असून सुस्तिथीत आहेत. उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 25 किमी अंतरावर रोमन कालीन मोठी बाजारपेठ असलेले तेर हे गाव आहे.

जैन धर्माचे पवित्र असे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर

उस्मानाबाद औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर 60 किमी अंतरावर कुंथलगिरी जैन धर्माचे पवित्र असे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर असून निजाम काळापासून हे क्षेत्र अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित आहे. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. इथला खवापासून बनवलेला पेढा हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

परंडा येथे प्राचीन किल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे प्राचीन किल्ला असून या किल्ल्याच्या चारही बाजूला खंदक आहेत. या किल्ल्यात आजही पुरातन दारुगोळा पाहायला मिळतो. या किल्ल्यापासून सीना कोळेगाव या धरण क्षेत्रात कल्याणस्वामींचा मठ असून येथे दासबोध या हस्त लिखित दुर्मिळ ग्रंथाची प्रत आहे. (tourists Crowds to see Tulja Bhavani and Naldurg Fort you can also do a one day trip)

इतर बातम्या – 

सफर करा मराठवाड्यातल्या ऐतिहासिक वारशाची, जाणून घ्या किल्ल्यांचे शहर ‘लातूर’बद्दल…

नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करताय, तर ‘ही’ आहेत औरंगाबादजवळची मोठी ठिकाणं…

(tourists Crowds to see Tulja Bhavani and Naldurg Fort you can also do a one day trip)

Follow Us
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; सत्तारांच्या वक्तव्यावर महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारा
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू
मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्....
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज...
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच...