अंबरनाथ : अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या स्कूल बसेस (School Buses)कडून शासनाचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप मनविसेनं केला आहे. याबाबत मनविसेनं अंबरनाथच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत भरारी पथका (Bharari Squad)मार्फत स्कूल बसेसवर कारवाई (Action) करण्याची मागणी केली आहे. कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षीपासून नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या स्कूल बसेस पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत. या स्कूल बसेसची फिटनेस चाचणी आणि एक्सपायरी तपासण्यासह शासनाने 2011 साली घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन त्यांच्याकडून होतंय का? याची चाचपणी करण्याची मागणी मनविसेनं केली आहे.
अंबरनाथ शहरात सध्या अनेक खासगी शाळांकडून स्कूल बसेस चालवल्या जातायत. यापैकी अनेक स्कूल बसेसकडून नियम पाळले जात नाहीत. त्यामुळं गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना सूचना द्याव्यात आणि त्यानंतरही शाळांनी स्कूलबसचे नियम पाळले नाहीत, तर आम्हाला शाळांची भेट घ्यावी लागेल, असं मनविसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांना निवेदन सुद्धा दिलं असून, या सगळ्याची पडताळणी करून शाळांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असं जतकर यांनी सांगितलं. अंबरनाथ शहरात अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. अनेक कंत्राटदार हे शासनाचे नियम पाळत नसून या सगळ्यावर कारवाई होण्याची आवश्यकता यानंतर व्यक्त होत आहे.
सीएनजी पंपवर सीएनजी भरुन बाहेर पडताच स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. येथील नागरिकांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणली. मात्र या स्कूल बसमध्ये विद्यार्थी नव्हते. फक्त चालकच होता. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्कूल व्हॅन जळून खाक झाली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. (Violation of government rules by school buses in Ambernath, demands of action by Bharari squad)