सबरीमाला मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली कार खड्ड्यात पडली, 8 जणांचा मृत्यू, अपघाताला जबाबदार काेण?

सध्या सबरीमाला यात्रेचा हंगाम सुरू आहे, दिवसाला सुमारे 1 लाख यात्रेकरू मंदिराला भेट देतात.

सबरीमाला मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली कार खड्ड्यात पडली, 8 जणांचा मृत्यू, अपघाताला जबाबदार काेण?
सबरीमाला अपघात
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 24, 2022 | 10:35 AM

चेन्नई, केरळ-तामिळनाडू सीमेजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक माेठी दुर्घटना (Accident Sabrimala Devotee) घडली. येथील कुमिलीजवळ सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारी व्हॅन उलटून आठ यात्रेकरू ठार झाले. या अपघातात अन्य दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. सर्व यात्रेकरू मूळचे थेनी-अँडीपेट्टीचे रहिवासी होते आणि ते शबरीमालाला भेट देऊन परतत होते.

सबरीमाला मंदिरातून भाविक परतत होते

कुमुली टेकडीवर हा अपघात झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. तेवढ्यात त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे

डोंगरी रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे सर्व लोक जिल्ह्यातील आंदिपट्टी येथील रहिवासी होते.

दररोज 1 लाख भाविक देतात भेट

सध्या सबरीमाला यात्रेचा हंगाम सुरू आहे, दिवसाला सुमारे 1 लाख यात्रेकरू मंदिराला भेट देतात. केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी या दुर्घटनेत आपले जवळचे आणि प्रियजन गमावलेल्या  कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला.

कसा घडला अपघात

डोंगराळ रस्त्यावरील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हे आठ जण जिल्ह्यातील आंदिपट्टी येथील रहिवासी असून त्यांच्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे लोकं सबरीमालाहून परतत होते.