AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अल-नीनो’चा परिणाम, देशात यंदा मान्सून कमी होणार

एजन्सीने जानेवारीतील परिस्थिती लक्षात घेऊन आपला मॉडेल अंदाज दिला आहे, तर त्यानंतरच्या महिन्यांत बरेच काही बदलू शकते.

‘अल-नीनो’चा परिणाम, देशात यंदा मान्सून कमी होणार
मान्सूनImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Feb 15, 2023 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली : सलग तीन वर्षे चांगला मान्सून (Mansoon) दिल्यानंतर ‘ला-नीना’ (la nino) निरोप घेत आहे. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो. जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सक्रिय असू शकते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. अमेरिकेच्या हवामान विभाग नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने दिलेल्या अहवालात हा इशारा दिला आहे. आता पुढील तीन महिने मध्य फेब्रुवारी ते मध्य एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अल निनोचा भारतातील मान्सूनच्या पावसावर थेट परिणाम होणार असल्याचे NOAAने म्हटले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात अल निनोबाबत अमेरिकेच्या हवामान संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी जानेवारीमध्येही एजन्सीने असाच अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जानेवारीच्या अहवालात जुलैनंतर अल निनोची स्थिती निर्माण होईल, असे म्हटले होते.

57 टक्के सक्रिय होण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अल निनो 57 टक्क्यांपर्यंत सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात परिस्थिती कशी असेल, याचे चित्र एप्रिल-मेच्या आसपासच स्पष्ट होईल.

भारतीय तज्ज्ञ काय म्हणतात

मान्सूनबाबत आताच काहीही बोलणे घाईचे असल्याचे भारतीय तज्ज्ञांनी सांगितले. एजन्सीने जानेवारीतील परिस्थिती लक्षात घेऊन आपला मॉडेल अंदाज दिला आहे, तर त्यानंतरच्या महिन्यांत बरेच काही बदलू शकते.

कोट्टायम येथील इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज स्टडीजचे संचालक डी शिवानंद पै म्हणाले, “जर एखादे मॉडेल सलग दोन महिने अल निनोचे संकेत देत असेल, तर त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

अल निनो आणि भारतीय मान्सून यांच्यात उलटा संबंध आहे. जर अल निनोची परिस्थिती एका वर्षात उद्भवली तर त्या वर्षी मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल, परंतु दोघांमध्ये एक-एक संबंध नाही. भारतातील मान्सूनच्या पावसावर हिंदी महासागरातील परिस्थिती, युरेशियन बर्फाचे आवरण आणि अंतर्गत हवामानातील फरक यासारख्या अनेक घटकांचा प्रभाव पडतो.”

अल निनो म्हणजे काय?

अल निनो हा जलवायू प्रणालीचा एक भाग आहे. हवामानावर त्याचा परिणाम होतो. अल निनोची परिस्थिती साधारणपणे दर तीन ते सहा वर्षांनी उद्भवते. पूर्व आणि मध्य विषुववृत्ताला प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर पाणी सामान्यापेक्षा गरम होते तेव्हा त्याला अल निनो म्हणतात. अल निनोच्या या परिस्थितीमुळे वाऱ्याची पद्धत बदलते आणि त्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये हवामानावर परिणाम होतो.

यापुर्वी कधी होता अल निनो

यापुर्वी २००४, २००९, २०१४ व २०१८ मध्ये अल निनोचा अंदाज होता. या सर्व वर्षांत देशात दुष्काळ पडला.तोच अंदाज २०२३ मध्ये आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.