नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते…, फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
'अमोल कोल्हेंना नाटक येत. त्यांना रडता येत ड्रामा करता येतो. लोक नाटकाचे तिकीट घेवून एकदा नाटक पाहतात. मात्र नाटक फ्लॉप निघालं की पुन्हा नाटकं पाहायला लोक जात नाहीत', नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हेंवर देवेंद्र फडणवीसांनी डागलं टीकास्त्र
शिवाजीराव आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही पण अमोल कोल्हे हे नाटकी आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर अमोल कोल्हेंना रडता येतं, जुमलेबाजी करता येते असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली आहे. ‘अमोल कोल्हेंना नाटक येत. त्यांना रडता येत ड्रामा करता येतो. लोक नाटकाचे तिकीट घेवून एकदा नाटक पाहतात. मात्र नाटक फ्लॉप निघालं की पुन्हा नाटकं पाहायला लोक जात नाहीत. शिरूरची जनता हुशार आहे. अमोल कोल्हे लोकांमध्ये गेले की त्यांचं जंगी स्वागत होतंय. त्यांना वाटतं वा काय स्वागत होतंय. मात्र जनता नंतर हळूच विचारते की खासदार साहेब पाच वर्षे कुठे होतात?, असं म्हणत फडणवीसांनी कोल्हेंवर निशाणा साधला आहे. बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
