शिवदीप लांडेंच्या मनाचा मोठेपणा, वॉचमनच्या हस्ते पोलीस इमारतीचं उद्घाटन, वॉचमनचे डोळे पाणावले, सर्वच स्तरातून कौतुक

| Updated on: Jun 15, 2022 | 4:03 PM

Shivdeep Lande : जेव्हा शिवदीप यांनी उद्घाटन करायला सांगितलं तेव्हा या वॉचमनच्या डोळ्यात पाणी आलं. शिवदीप लांडे यांच्या या निर्णयाचं सर्वत्र सर्वत्र कौतुक होतंय.

शिवदीप लांडेंच्या मनाचा मोठेपणा, वॉचमनच्या हस्ते पोलीस इमारतीचं उद्घाटन, वॉचमनचे डोळे पाणावले, सर्वच स्तरातून कौतुक
Follow us on

मुंबई : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) हे त्यांच्या वर्दीतल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक किस्से आपण वाचले, ऐकले आहेत. आताही असाच एक प्रसंग समोर आला आहे. नुकतंच डीआयजी शिवदीप लांडे यांच्या हस्ते सहरसा इथल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन (Inauguration) केलं.पण या प्रसंगी शिवदीप यांनी जे केलं त्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवदीप यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन ठेवण्यात आलं होतं. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वॉचमनच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय शिवदीप लांडे यांनी घेतला. महिला कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि वॉचमन कबीर आलम यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. शिवदीप यांनी जेव्हा या दोघांना उद्घाटन करण्यास सांगितलं तेव्हा या दोघांसह उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

शिवदीप लांडे यांच्या मनाचा मोठेपणा

डीआयजी शिवदीप लांडे यांच्या हस्ते सहरसा इथल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन केलं.पण या प्रसंगी शिवदीप यांनी जे केलं त्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवदीप यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन ठेवण्यात आलं होतं. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वॉचमनच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय शिवदीप लांडे यांनी घेतला. महिला कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि वॉचमन कबीर आलम यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. शिवदीप यांनी जेव्हा या दोघांना उद्घाटन करण्यास सांगितलं. त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून या दोघांसह उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

कौतुकाचा वर्षाव

जेव्हा शिवदीप यांनी उद्घाटन करायला सांगितलं तेव्हा या वॉचमनच्या डोळ्यात पाणी आलं. शिवदीप लांडे यांच्या या निर्णयाचं सर्वत्र सर्वत्र कौतुक होतंय. त्यांच्या कृतीने समाजात एक चांगला संदेश जात असल्याचं म्हटलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

शिवदीप लांडे कोण आहेत?

बिहार केडरमधून शिवदीप लांडे डिसेंबर 2016 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोथी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. साडे तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले. अमंली पदार्थ विरोधी पथकातील कामगिरीच्या जोरावर शिवदीप लांडे यांना एटीएसची जबाबदारी देण्यात आली होती. एटीएसमध्येही शिवदीप लांडे यांनी चांगली कामगिरी केली होती. युरेनियमचा साठा पकडणे, असो की मनसुख हिरेन ह्त्या प्रकरणाचा छडा लावण्याचं काम शिवदीप लांडे यांच्या टीमनं केलं होतं. मनसूख हिरेन प्रकरणही शिवदीप लांडे यांनीच उघड केलं आहे.