जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले, 100 देश रांगेत, कोट्यावधी..
भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यामध्येच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. भारतीय संरक्षण कंपन्यांनी धमाका केला. देशभरात भारताच्या संरक्षण प्रणालीची जबरदस्त मागणी वाढली आहे.

संरक्षण क्षेत्रात भारत धमाकेदार कामगिरी करत आहे. देशातील संरक्षण कंपन्यांना मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, 9 सरकारी कंपन्यांना पाच लाखापेक्षा अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. सध्या स्थिती अशी आहे की, भारतीय कंपन्यांकडे इतक्या जास्त ऑर्डर आहेत की, ते नवीन ऑर्डर कोणत्याही स्वीकारू शकत नाहीत. संरक्षण मंत्रालयाच्य रिपोर्टनुसार, हिंदुस्तान एयरोनाटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलजवळ सर्वात जास्त 260960 कोटी ऑर्डर आल्या आहेत. वायुसेना, नाैसेनाजवळ विमान तयार करण्याच्या, असलेल्या विमानांची देखभाल दुरूस्ती आणि हेलिकॉप्टरचे निर्माणचे काम आहे. या सर्व ऑर्डर पूर्ण करण्यासाठी एचएएलला 8 ते 10 वर्ष लागणार आहेत. जर आता एचएएलला कोणतेही ऑर्डर मिळते तर 10 वर्षानंतर ती ऑर्डर पूर्ण होऊ शकते. नाही तर मग कंपनीकडे दुसरा पर्याय असा आहे की, त्यांनी अजून एका ठिकाणी आपले उत्पन्न सुरू करणे.
दुसऱ्या क्रमांकावर बीईएल आहे, त्यांच्याजवळ 73400 कोटींचे ऑर्डर आहेत. ते संरक्षण उपकरणे निर्माण करतात. रडार, मिसाईल रक्षा संचार सिस्टम याचा समावेश आहे. सैन्याची वाहने तयार करणारी कंपनी भारत मूवर्स लिमिटेड 16395 कोटीचे ऑर्डर मिळाली आहेत. गायडेड मिसाइल, अंडर वॉटर सिस्टम आणि सैन्य साजोसमान भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्याजवळ 25962 कोटी रूपयांचे मिश्र धातू निगम लिमिडेट यांच्याजवळ 2440 कोटी रूपयांचे ऑर्डर आहेत.
भारतीय कर्मचाऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. हा भारताचा मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल. केंद्र सरकारने संरक्षण बजेटमध्ये 75 टक्के खर्च देशात खर्च करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, दरवर्षी 2 लाख कोटींची खरेदी होत आहे. सध्याच्या परिस्थितीला 100 देश भारताकडून संरक्षण प्रणाली खरेदी करत आहेत.
हा भारताचा मोठा विजय म्हणावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात भारताकडून शस्त्र खरेदी केली जात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने जगाला आपली शस्त्र ताकद दाखवली. ज्यानंतर खळबळ उडाली. पाकिस्तानला भारतापुढे गुडघे टेकावे लागले. भारताचे हल्ले रोखण्यासाठी त्यांनी थेट अमेरिकेची मदत घेतली.