गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर धीरेंद्र कृष्णशास्त्रींची परखड प्रतिक्रिया; म्हणाले तुमच्या इस्लाममध्ये…
नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू असलेली चर्चा अजूनही सुरू आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) आता नवरात्रीदरम्यान गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मागणीवर काय म्हणाले ते पाहा...

नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू असलेली चर्चा अजूनही सुरू आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) आता नवरात्रीदरम्यान गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी म्हटले आहे की, नवरात्री हा सनातन सण आहे आणि त्यात मुस्लिमांची काय भूमिका आहे, कारण त्यांच्या धर्मात मूर्तीपूजा निषिद्ध आहे.” धीरेंद्र कृष्णशास्त्री सध्या मुंबईत असून अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवात सहभागी झाले होते.
मैरे अंगने मे तुम्हारा क्या काम है?
प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “सर्वांनी नवरात्री साजरी केली पाहिजे. नवरात्री हा सनातन सण आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध आहे. आमच्या देशात दुर्गा पूजा आणि गरबा उत्सव हे मूर्तीपूजेचे सण आहेत. मग माझ्या अंगणात तुमचा काय संबंध?”
#WATCH | Mumbai, Maharashtra | Bageshwar Dham Peethadhishwar Dhirendra Krishna Shastri says, “Everyone should celebrate this festival. Navratri, a Sanatan festival, is part of the Sanatan tradition, and idol worship is forbidden among Muslims. We have Durga Puja, the Garba… pic.twitter.com/FRqhLSa4pb
— ANI (@ANI) September 17, 2026
धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनीही पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मी भारताच्या पंतप्रधानांना त्यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभो आणि ते आनंदाने देशाचा कारभार सांभाळोत, जेणेकरून आपण सर्व भारतीय आणि आपला भारत सुरक्षित राहील.”
मुस्लिम बंदीशी संबंधित प्रकरण काय?
गरबा कार्यक्रमापूर्वी विश्व हिंदू परिषदेने (VHP) आवाहन केले होते की, मुस्लिमांना गरबा-दांडिया कार्यक्रमात सहभागी होऊ देऊ नये, कारण हा देवीच्या पूजेचा उत्सव आहे, मनोरंजनाचा नाही. या संदर्भात, विश्व हिंदू परिषदेने गरबा कार्यक्रमातील सहभागींची ओळख पटवून त्यांचे आधार कार्ड तपासण्याचे निर्देशही दिले होते. यामध्ये कपाळावर टिळा लावण्यासारख्या सूचनांचा समावेश होता.
विश्व हिंदू परिषदेच्या या आवाहनाला राज्यातील विरोधी पक्षांनीही तीव्र विरोध केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनाला विरोध केला आहे. मात्र, भाजप आणि इतर काही प्रमुख व्यक्तींनी याला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे.