Freedon Fighters : इंग्रजांचा पाया हादरवणाऱ्या भारतीय वीरांमध्ये पंतप्रधानांच्या भाषणात कुणाकुणाचा नामोल्लेख? जाणून घ्या…

| Updated on: Aug 15, 2022 | 10:49 AM

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावलाय. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त यंदाचा सोहळा विशेष आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ देशभर साजरा होताना दिसतोय.

Freedon Fighters : इंग्रजांचा पाया हादरवणाऱ्या भारतीय वीरांमध्ये पंतप्रधानांच्या भाषणात कुणाकुणाचा नामोल्लेख? जाणून घ्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : आज भारत देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त यंदाचा सोहळा विशेष आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होताना दिसत असून घरोघरी राष्ट्रध्वज फडकवला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सुरुवातीला महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यांचं स्मरण केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलं. भाषणादरम्यान देशाच्या स्वातंत्र्याचा उल्लेख करत, ‘क्रांतीवीरांनी ब्रिटिशांची झोप उडवली, ‘असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अवघ्याला देशाला क्रांतीवीरांच्या अनमोल कामाची आठवण करून दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वीरांमध्ये कुणाकुणाचा नामोल्लेख, याविषयी अधिक जाणून घ्या..

पंतप्रधानांचं भाषण पाहा

पंतप्रधान काय म्हणालेत….

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारताच्या कानाकोपऱ्यात त्या सर्व महापुरुषांचं स्मरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यांना एका कारणानं इतिहासात स्थान मिळाले नाही किंवा त्यांचा विसर पडला. आज देशाने अशा वीर, महापुरुष, बलिदान, सत्याग्रहींना शोधून त्यांचे स्मरण केले आहे. त्यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहलाल नेहरूजी, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, लाल बहादूर शास्त्री, दीनदयाळ उपाध्याय, जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे. नाना देशमुख यांनी स्वातंत्र्य लढा लढला आणि देशाची उभारणी केली. अशा अनेक महापुरुषांना आदरांजली वाहण्याची आज संधी आहे. आज त्यांना स्मरण आणि अभिवादन करण्याची वेळ आली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणालेत.’

महापुरुषांचा उल्लेख

काँग्रेसला टोला

‘क्रांतीवीरांनी ब्रिटिशांची झोप उडवली, ‘असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी देशाला महापुरुषांची पुन्हा एकदा आठवण करून दिली. यावेळी ‘भारताच्या कानाकोपऱ्यात त्या सर्व महापुरुषांचं स्मरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यांना एका कारणानं इतिहासात स्थान मिळाले नाही,’ असा उल्लेख करत पंतप्रधानांनी काँग्रेसला टोलाही लगावला.