ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही, आदिवासी लोकांची खास ट्रिक

सापांबद्दल आजही अनेक समज, गैरसमज आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर सापांचा धोका अधिक वाढतो, कारण साप या काळात बिळातून बाहेर पडून जमिनीवर मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे या काळात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही, आदिवासी लोकांची खास ट्रिक
snakes
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 9:37 PM

भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळून येतात, मात्र त्यातील काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच साप हे विषारी आहेत. ज्यामध्ये नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो, दुसरा सर्वात विषारी साप म्हणजे मण्यार, फुरसे आणि घोणस हे भारतामधील प्रमुख चार विषारी साप आहेत. याला आपण बिग फोर असं देखील म्हणतो. विशेष म्हणजे हे चारही साप महाराष्ट्रात आढळून येतात. सध्या घोणस प्रजातीच्या सापाची संख्या देशभरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सापांपासून बचावाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कायम सावध राहणं हाच आहे. जर तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला मारू नका, किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न देखील करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या.

सापांपासून बचावासाठी आजही ग्रामीण भागांमध्ये विविध उपाय केले जातात. विशेष: जे लोक ग्रामीण भागांमध्ये राहतात, किंवा ज्यांच्या वस्त्या या जंगल परिसरात आहेत, अशा लोकांना तर सापांचा धोका अधिक असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर साप अशा ठिकाणी अनेकदा घरामध्ये शिरतात. सापांपासून बचावासाठी या लोकांकडून काही पारपरिक उपाय देखील केले जातात. आदिवासी समाजामध्ये सापांपासून बचावासाठी एक खास ट्रिक वापरली जाते. ती म्हणजे ज्या घरात सर्पवेल असेल त्या घरात शक्यतो साप येत नाही, कारण या वेलीला विशिष्ट वास असतो. अनेकजण या वेलाच्या वाळलेल्या काड्या कायम आपल्या खिशामध्ये ठेवतात, यामुळे सापांपासून संरक्षण होतं अशी मान्यता आहे. आदिवासी पाड्यांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये आजही अनेक ठिकाणी ही ट्रिक वापरली जाते.

मात्र या ठिकाणी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. यामुळे सापांना लपण्यसाठी जागा सापडत नाही, तसेच जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. चुकून एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झालाच तर थोडा देखील वेळ वाया न घालवता अशा व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करावं,  वेळेत उपचार मिळाला तर अशा रुग्णाचा जीव वाचू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us