Maharashtra News LIVE : लव्ह जिहाद, जमीन लँड जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा
Maharashtra News LIVE Updates : भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. एवंढच नाही तर देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा...

LIVE NEWS & UPDATES
-
आकाश मोरे बारामतीची पोट निवडणूक लढवण्यावर ठाम, पण…
बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मात्र पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेचा महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला तर मी आज देखील उमेदवारी माघारी घेण्यास तयार असं सांगून आकाश मोरे यांनी सांगून निवडणूक लढवण्यास संदर्भात सस्पेन्स निर्माण केलाय.
-
अमरावतीचे पोलीस राजस्थानात का बनले वाळू मजूर?
अमरावती पोलिसांनी तीन कोटींचे ड्रग्स जप्त केल्याचे प्रकरण. अमरावती शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस राजस्थानात बनले नदीत वाळू मजूर आणि हॉटेल मध्ये सिनेस्टाईल तीन कोटींच्या ड्रग्जच्या सूत्रधारास अखेर अटक. मजूर बनून राजस्थान मधील नदीत दिला कडा पहारा. 50 किलोच्या ड्रग्जची अमरावती पोलिसांनी केली डमी डील. पोलिसांनी बदलल्या आपल्या वाहनाच्या नंबर प्लेट्स, महाराष्ट्रा ऐवजी राजस्थानच्या नंबर प्लेट. मुख्य आरोपीला एमडी ड्रग्जच्या खरेदीचे आमिष दाखवण्यात आले.
-
-
मला खात्री आहे काँग्रेस माघार घेईल – विखे पाटील
“खरं म्हणजे निवडणूक बिनविरोध करायला पाहिजे. काँग्रेसने माघार घ्यायला पाहिजे होती, तो त्यांचा दोष नाही. पक्ष नेतृत्व,पक्षाला ज्या पद्धतीने घरघर लागली आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी असं माझं आवाहन आहे. दुर्देवी परिस्थितीत अजित दादा यांचा अपघात झाला आहे, मला खात्री आहे काँग्रेस माघार घेईल” असं विखे पाटील बोलले.
-
लव्ह जिहाद, जमीन लँड जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा
लव्ह जिहाद, जमीन लँड जिहाद विरोधात सासवड ते कोंढवा हिंदू जन आक्रोश मोर्चा व रॅलीचे आयोजन. भाजप आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार संग्राम जगताप, माजी आमदार संजय जगताप मोर्चा मध्ये सहभागी होणार. शिवतीर्थ सासवड, भिवरी बापदेव घाट मार्गे खडीमशीन चौक कोंढवा असा मोर्चाचा मार्ग असणार. मोर्चाच्या पार्श्वभूमी मोर्चा मार्गावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.
-
सिंधुदुर्गात गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय संकटात, अनेक पदार्थांना कात्री
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता सिंधुदुर्गातील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने जिल्ह्यातील हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कणकवलीतील काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅस अभावी आपल्या रोजच्या मेनूतील अनेक पदार्थ बनवणे बंद केले आहे, तर काही ठिकाणी घरातूनच पदार्थ बनवून हॉटेलमध्ये विक्रीसाठी आणले जात आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा कधी सुरळीत होईल आणि हे संकट कधी टळेल, याकडे आता सर्व हॉटेल धारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
-
-
जळगावात वाढत्या उन्हाचा केळीला तडाखा, रोपांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची नवी युक्ती
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा 40°C पार गेल्याने याचा मोठा फटका केळीच्या बागांना बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे केळीची पाने पिवळी पडून सुकू लागल्याने रोपांचे नुकसान टाळण्यासाठी नशिराबाद परिसरातील शेतकरी सरसावले आहेत. कडाक्याच्या उन्हापासून केळीच्या कोवळ्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांना पांढऱ्या कापडी पिशव्यांचे संरक्षक कवच घातले आहे. प्रखर सूर्यकिरणांपासून रोपांचा बचाव व्हावा आणि बागेतील ओलावा टिकून राहावा, यासाठी सुरू असलेली शेतकऱ्यांची ही धडपड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
चंद्रपुरात गॅस टंचाईची भीती; एजन्सीसमोर रांगाच रांगा
इराण-इराक आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने चंद्रपूर शहरात नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी काही ठिकाणी चक्क खाजगी बाऊन्सर्स तैनात करण्याची वेळ आली आहे. घरपोच गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असूनही, नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीवर गर्दी करत आहेत. या गोंधळामुळे नागरिक आणि एजन्सी मालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
-
जालन्यातील शाळा बनली धोकादायक, चिमुरड्यांना मंदिरात बसून धडे गिरवण्याची वेळ
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नागठाणा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून चक्क मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या दोन वर्गखोल्या पूर्णपणे मोडकळीस आल्या असून त्या कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना मंदिरात स्थलांतरित केले आहे. वारंवार तक्रारी करून आणि शाळा प्रशासनाने शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण?” असा सवाल आता ग्रामस्थ विचारत असून, प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहे.
-
ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला इराणने धडा शिकवला- संजय राऊत
इराण-अमेरिका या युद्धविरामाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळायला हवं होतं. ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला इराणने धडा शिकवला. देशासाठी कसं लढावं, हे इराणने दाखवून दिलं, असे संजय राऊत म्हणाले.
-
अमेरिकेबाबत जगाला असलेली भीती इराणने मोडून काढली- संजय राऊत
इराणसारखा देश अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले. तरीही इराण अमेरिका-इस्त्रायलला शरण गेला नाही. अमेरिकेबाबत जगाला असलेली भीती इराणने मोडून काढली, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले
-
जळगाव : अमेरिका-इराण मध्ये सीझफायर घोषित होताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगाव : अमेरिका – इराण मध्ये सीझफायर घोषित होताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 3 हजार रूपयांनी तर चांदीचा दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपये इतके आहेत.
-
चंद्रपूर :- गॅस टंचाईचा भास, चंद्रपुरात रांगांचा गोंधळ, बाऊन्सर तैनान
इराण-इराक-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना चंद्रपूर शहरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच लांबलचक रांगा लागत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी खासगी बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत. घरपोच गॅस पुरवठा सुरू असतानाही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसत आहे.
-
बीड – सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याच्या उल्लेखाचे निनावी पत्र व्हायरल.
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदू खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याच्या उल्लेखाचे एक निनावी पत्र सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळासह सर्वत्र या संदर्भात उलट सुलट चर्चा होत आहेत.
-
चंद्रपूर : मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
चंद्रपूर :- मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. अल्पेश दहागावकर असं 25 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.
अल्पेश लग्नाच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचतांना अचानक खाली कोसळला. सुरुवातीला कोणालाही हे लक्षात आलं नाही, मात्र काही वेळातच तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याला गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं.
-
सोलापुरातील अवंती नगरमध्ये दुचाकीवरून येत चेन स्नॅचिंगचा प्रकार
वॉकिंग करत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबवले. विजयालक्ष्मी सावळे असे यां पिडीत महिलेचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांच्या 15 टीम चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाल्यात.
-
भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार
भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे. पुढील गुन्ह्यात पुन्हा ताबा मागण्याची शक्यता आहे. SIT ने कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तपासातील महत्त्वाचे खुलासे केले. सुरक्षा कारणास्तव मागील सुनावणी ऑनलाईन झाली होती. आजही ऑनलाईन सुनावणी होण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. खरात प्रकरणाकडे राज्यभराचं लक्ष लागलं आहे.
-
वाकड – म्हातोबानगर परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम
चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या वाकड-म्हातोबानगर येथील २४ मीटर डिपी रस्त्यावरील १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या तसेच बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. महापालिका स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
-
पिंपरी चिंचवड : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना दणका; ५४३५ नागरिकांकडून सव्वा कोटी दंड वसूल
पिंपरी-चिंचवड शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात ५ हजार ४३५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक कोटी १५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर शहर कचराकुंडीमुक्त करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या वतीने सुरू आहेत. शहरातील सर्व ठिकाणच्या कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याबाबत एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, स्वयंसेवक नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.
-
कल्याण रेल्वे स्कायवॉक बनला फेरीवाल्यांचा अड्डा; प्रवाशांना चालायलाही जागा नाही
कल्याण रेल्वे स्कायवॉक बनला फेरीवाल्यांचा अड्डा; प्रवाशांना चालायलाही जागा नाही… गर्दीत चेंगराचेंगरीची भीती वाढली; सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे आणि KDMC चे दुर्लक्ष उघड; संतप्त प्रवाशांची तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
-
पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! पवना धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
कडक उन्हाळा आणि वाढत्या मागणीमुळे पिंपरी- चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, धरणात आता केवळ ४६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून अखेरपर्यंत म्हणजेच पावसाळ्याच्या आगमनापर्यंत शहराला पुरेल इतकाच असल्याने, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. पिंपरी चिंचवड शहराला मुख्यत्वे मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज रावेत येथील बंधाऱ्यातून ५२० एमएलडी पाणी उचलते. याव्यतिरिक्त: एमआयडीसी: शहराच्या काही भागांसाठी ३० एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
-
गोरेगाव पूर्वेकडील रहेजा हाइट्स येथे दिसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा
मुंबईतील गोरेगाव पूर्व, दिंडोशी येथील रहेजा हाइट्समध्ये बिबट्या वारंवार दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल रात्रीसुद्धा एक बिबट्या या हाईप्रोफाइल सोसाइटीच्या पार्किंग लॉटमध्ये शिरला आणि तिथे उभ्या असलेल्या एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, लोक आपल्या मुलांना सोसायटीमध्ये खाली एकटे सोडत नाहीत. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी टीव्ही9 च्या माध्यमातून सरकारी प्रशासनाकडे बिबट्याला पकडण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा एक पिंजरा लावला.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता पर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ‘ऊर्जा, पूजा आणि शरीरशांती’च्या नावाखाली शोषण केल्याचे आरोप आहेत. भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. नगर-पुणे महामार्गावर चास घाटात दारूच्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. भरदिवसा आयशर ट्रक पलटी झाली आहे. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. गोंदिया येथे गॅस टंचाईवरून घाबरण्याचे कारण नाही. असं आवाहन राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी जनतेला केलं आहे. अशाच देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा…