
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा झालेला नरसंहाराचा तपास करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. या हल्ल्यातील सामील अतिरेक्यांना भारतीय सैन्याने अखेर ठार केले आहे. ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत या अतिरिक्यांची ओळख आणि त्यांच्या नेटवर्कचे जाळे आता उघड होत आहे. या हल्ल्याची सारी योजना पाकिस्तानात रचली होती. यात थेट लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी सरकारी एजन्सींचा सहभाग उघड झाला आहे.
तपासात असे उघड झाले आहे की पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात सामील तीन अतिरेकी सुलैमान शाह उर्फ फैझल जट्ट, अबू हमजा उर्फ अफगान आणि यासिर उर्फ जिब्रान पाकिस्तानात रहाणार आहेत. आणि ते लष्कर-ए-तोयबाचे A++ आणि A कॅटगरीचे कमांडर होते. हे अतिरेकी न स्थानिय कश्मीरी होते आणि अलिकडेच भरती झालेले अतिरेकी नव्हते ते लष्कर-ए-तोयबाचे कमांडर होते असे उघडकीस आले आहे.
भारतीय गुप्तचर एजन्सीच्या मते हे तीन अतिरेकी मे २०२२ मध्ये गुरेज सेक्टरमधून एलओसी पार करुन कश्मीर खोऱ्यात दाखल झाले होते. त्यांचे रेडिओ सिग्नल त्याचवेळी इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतू नंतर तेव्हा हे अतिरेकी पहलगाम जवळी एक झोपडीत लपले. येथे स्थानिक मदतगार परवेझ आणि बशीर अहमद जठार यांनी त्यांना शरण दिली होती.
ऑपरेशन महादेव अंतर्गत त्यांनी २८ जुलै रोजी या तिघा अतिरेक्यांना ठार केले गेले तेव्हा त्याच्याजवळून महत्वाचे पुरावे सापडले आहेत. यातील दोन अतिरेक्यांकडे पाकिस्तानी व्होटर आयडी कार्ड सापडले असून ते लाहोर आणि गुजरांवाला येथून जारी केलेले आहेत. या शिवाय त्यांच्याकडे एका सॅटेलाईट फोनमधून मायक्रो-एसडी कार्ड मिळाले आहे, त्यात NADRA चा बॉयोमेट्रीक डेटा सापडला. या डेटातून या अतिरेक्यांचे नागरिकत्व, कसूर जिल्हा, पीओके येथील कायमस्वरुपी पत्त्याची माहिती मिळाली आहे.
अतिरेक्यांकडे पाकिस्तानात तयार झालेले चॉकलेट आणि इतर खाण्या पिण्याचे सामान सापडले आहे, ज्यावर २०२४ चे मुझफ्फराबाद येथे पाठवले गेलेल्या शिपमेंटच्या लॉटचे नंबर होते.
दरम्यान एक आणखी महत्वाची माहीती मिळाली आहे की लष्करच्या लाहोर स्थित ऑपरेशन चीफ साजिद सैफुल्लाह जट्ट या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे. तर रावळकोट निवासी रिझवान अनीस याने कश्मीरात मारले गेलेल्या अतिरेक्यांसाठी गायबाना नमाज-ए-जनाजा आयोजित केला होता. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानात या अतिरेक्यांना नायकासारखा मानसन्मान मिळाला.
फोरेन्सिक तपासानंतर हे स्पष्ट झाले आहे की हल्ल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या त्याच AK-103 रायफलच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे, या रायफल दाचिगाम-हरवान जंगलात ठार केलेल्या अतिरेक्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी देखील संसदेत सांगितले की आमच्याकडे आता पहिल्यांदा पाकिस्तानकडून जारी केलेले सरकारी दस्तावेज आहेत. ज्यामुळे स्पष्ट होते की पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी पाकिस्तानी होते. हा डोजिएर आतापर्यंतचा सर्वात ठोस आणि निर्णायक दस्तावेज मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची अतिरेक्यांना पाठींबा देण्याची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.