गुजरातच्या मोरबीत विहिरीच्या पाण्यात लाटांची निर्मिती, तपासात हे निघाले कारण…

शेतकरी सदारिया म्हणाले की, ही विहीर त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी बांधली होती. पाण्यातील हालचाल सर्वप्रथम रविवार आणि सोमवारी लक्षात आली. मंगळवारी ही हालचाल थोड्या काळासाठी थांबली, परंतु बुधवार आणि गुरुवारी ती पुन्हा सुरू झाली, ज्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

गुजरातच्या मोरबीत विहिरीच्या पाण्यात लाटांची निर्मिती, तपासात हे निघाले कारण...
Waves form in well water in Morbi
| Updated on: Aug 07, 2026 | 10:59 PM

गुजरातच्या मोरबी येथे एका विहिरीच्या पाण्यात समुद्राच्या सारख्या लाटा तयार झाल्याचा अजब प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून विहिरीतील पाणी अशा प्रकारे उचंबळू लागल्याने या भागात हा कुतुहलाचा विषय बनला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मोरबीचे कलेक्टरनी या विहिरीचे तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. या १८ फूट खोल विहिरीचे पाणी अचानक लाटांसारखे हलत आहे. या विहीरीचे पाणी पाहायला आता गर्दी होऊ लागली आहे. कलेक्टर स्वप्नील खरे यांच्या आदेशानंतर भू-संशोधकांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

मोरबी तहसीलच्या वीरपरडा गावातील प्रांजीवन सदारिया यांच्या शेतातील ही अजब विहीर अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली आहे. विहिरीचे पाणी हलू लागल्याने या परिसरात भूकंपाचा दहशत पसरली आहे. पाण्याची ही हालचाल भूकंपाच्या लहरीमुळे होत असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी भूकंपाचे कोणताही संबंध यामागे नसल्याचे म्हटले आहे. सुरुवातीच्या तपासानुसार ही एक नैसर्गिक भूवैज्ञानिक प्रक्रिया म्हटली जात आहे.

भू-संशोधकांनी या विहिरीची तपासणी केली आहे. मोठ्या पावसाने विहिरीचे झरे सुटून पाणी भरले असावे आणि हवेच्या कारणांनी त्यात लाटा येत असाव्यात असा संयश व्यक्त केला जात आहे. या घटनेमागे भूकंपाच्या लहरींचा काही संबंध असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे मोरबी येथील जिओलॉजिस्ट जे.एस.वाढेर यांनी सांगितले. मात्र, या घटनेचा आणखीन तपास केला जात असून निरीक्षण केले जात आहे. या विहिरीचे मालक प्रांजिवन सदारिया यांच्या मते त्यांनी पहिल्यांदा २ ऑगस्ट रोजी हा चमत्कार पाहिल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की मी जेव्हा रविवारी माझ्या शेतावर पोहचलो तर विहिरीचे पाणी किनाऱ्यावरुन वाहत होते. तेव्हापासून असे होत आहे.

विहिरीच्या पाण्यात उसळी

या मागे कोणतीही भूकंपाच्या लहरींचा संबंध नाही. तर प्रथमदृष्ट्या असे निदर्शनास आले आहे की जास्त पावसाने भुजलाची पातळी वाढली आहे. आणि जमीनीच्या आत कातळातील रिकाम्या जागात ( पोर स्पेस ) अडकलेली हवा त्यामुळे बाहेर पडत आहे. ज्यामुळे विहिरीच्या पाण्यात उसळी येत आहे. गांधीनगरातील इंस्टीट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (ISR)च्यानुसार या भागात कोणतीही सक्रीय फॉल्ट लाईन ( भूकंपाच्या फटी ) नाहीत. भुजल पुन्हा भरल्याचे ( ग्राऊंड वॉटर रिचार्ज )संभाव्य कारण मानले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us