बांगलादेश-भारत सीमेवर नक्की चाललंय काय? थेट बांगलादेशातून 20 जण आले आणि एका…

भारत-बांगलादेश सीमेवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीमेजवळील एका गावात भारतीय नागरिकाचं अपहरण झाल्याचे समोर आलं आहे.

बांगलादेश-भारत सीमेवर नक्की चाललंय काय? थेट बांगलादेशातून 20 जण आले आणि एका...
| Updated on: Aug 10, 2026 | 9:04 AM

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील भारत-बांग्लादेश सीमेजवळ भयंकर प्रकार समोर आला आहे. एका भारतीय चहा उत्पादक शेतकऱ्याचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना राजगंज ब्लॉकच्या कुकुरजान भागात घडली आहे. दीपांकर गोप असे 35 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. दीपांकर हा चौलाहाटी गावातील तसर पाड्यावर राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपांकर यांना बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गातून आलेल्या वीस जणांनी दीपांकरचं अपहरण केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच चौलहाटी सीमेजवळ एका बांग्लादेशी नागरिकाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिक आणि BSF जवानांनी पकडून बांगलादेशी नागरिकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकाचं तस्करी करणाऱ्या टोळीशी कनेक्शन असक्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या बांगलादेशीला ताब्यात घेतल्यानंतर शेतकरी दीपांकरचं देखील अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु या प्रकरणाच्या तपासानंतर अधिकृत माहिती समोर येईल.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

दीपांकरने शनिवारी सकाळी सीमेजवळील चहाच्या मळ्यात कामाला गेला. दीपांकर हा शेतात किटकनाशक फवारणी करत होता. त्याचवेळी 20 बांगलादेशीच्या गटाने बेकायदेशीररित्या भारतात घुसले. त्यानंतर शेतात काम करणाऱ्या दीपांकरला घेरलं. त्यावेळी दीपांकरने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी बांगलादेशी आणि दीपांकर यांच्यामध्ये झटापट देखील झाली. परंतु संख्येने जास्त असलेल्या बांगलादेशींसमोर दीपांकर फार काही करू शकला नाही. त्यानंतर दीपांकरला सीमा पार करून बांगलादेशच्या पंचगढ जिल्ह्यात नेण्यात आलं, असा दीपांकरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. दीपांकरच्या अपहरणामुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले आहेत. या घटनेची माहिती मिळताच BSF जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. या शेतकऱ्याला पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळतेय. यावरून दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा यंत्रणाच्या प्रतिनिधींची बैठक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा दीपांकरला भारतात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us