मुंबईच्या चेंबूर भागात असलेल्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेज येथून कॉमर्स शाखेत पदवी मिळवली. पुढे मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध वृत्तसंस्थांमध्ये इंटर्नशिप करत पत्रकारितेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
राज्यासाहित देशाचं राजकारण, शिक्षण, बिझनेस, लाईफस्टाईल, व्हायरल न्यूज, क्रीडा, गुन्हेगारी अशा विविध विषयांवर लिखाणाची आवड. विशेषतः सामाजिक विषयांवरील ब्लॉग लिखाणात त्यांचा हातखंडा आहे. त्यानंतर साम टीव्ही डिजिटलमध्ये मल्टीमीडिया प्रोड्युसर म्हणून 4 वर्ष कार्यरत होते. आता जून 2026 पासून टीव्ही 9 मराठी डिजिटलमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.
फक्त व्याजातून होणार 5 लाखांची कमाई; पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, जाणून घ्या कॅल्क्युलेशन
केंद्र सरकारने जुलै-सप्टेंबर 2026 तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले आहेत. नव्या घोषणेनुसार व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज 7.7 टक्के इतकेच राहणार आहे. या सरकारी योजनेच्या माध्यमातून फक्त व्याजातून ५ लाख रुपयांहून अधिकची कमाई होऊ शकते. त्यासाठी योजनेचं कॅल्क्युलेशन जाणून घ्या. प्रत्येक गुंतवणूकदार चांगल्या परताव्यासाठी योजनेत पैसे गुंतवत असतो. […]
- Vishal Gangurde
- Updated on: Jul 3, 2026
- 9:19 am
धाड धाड…! पोलिसांकडून भल्या पहाटे हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबादमध्ये पोलीस आणि आरोपीमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपीने शस्त्र जप्तीच्या कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना त्याने गोळीबार केला. आरोपीच्या गोळीबारानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. पोलिसांच्या माहितीनुसार, गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपल्बिक पोलीस […]
- Vishal Gangurde
- Updated on: Jul 3, 2026
- 9:31 am
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; 7 धरणांत किती टक्के पाणीसाठा? वाचा संपूर्ण माहिती
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सातही धरणांची पाणीपातळी वाढली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे. 7 पैकी 5 धरण क्षेत्रात इतर धरणांच्या तुलनेने कमी पाऊस पडत आहे. पण तरीही या सात धरणातील पाणीसाठा वाढू लागला […]
- Vishal Gangurde
- Updated on: Jul 3, 2026
- 7:44 am