
श्वेता तिवारी-डॉली बिंद्रा : बिग बॉस सीझन 4 मध्ये श्वेता तिवारी आणि डॉली बिंद्रा यांच्यात झालेले भांडण लोकांना अजूनही आठवते. जेव्हा डॉलीने वाइल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश केला तेव्हा तिने श्वेता तिवारीवर बरेच वैयक्तिक हल्ले केले. प्रत्युत्तर म्हणून श्वेता तिवारीनेही डॉली बिंद्रावर वैयक्तिक टीका केली होती. दोघींनी एकमेकांना शिवीगाळ आणि धमक्याही दिल्याचं पाहायला मिळालं होतं.

शमिता शेट्टी आणि देवोलिना भट्टाचार्य : बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये शमिता शेट्टी आणि देवोलीना भट्टाचार्य यांच्यात प्रचंड वैर दिसले. देवोलीना घरात व्हीआयपी म्हणून आली होती. एका टास्क दरम्यान देवोलीना आणि शमिता यांच्यात हाणामारी देखील झाली. घरातील सदस्यांना दोघांना वेगळे करावे लागले. भांडणानंतर शमिताची तब्येतही बिघडली होती.

श्रीजिता डे आणि टीना दत्ता : बिग बॉस 16 मध्ये श्रीजिता डे आणि टीना दत्ता यांच्यात सुरुवातीला मैत्री दिसून आली होती. दोघांनीही 'उतरन' मध्ये एकत्र काम केले आहे. तथापि, जेव्हा श्रीजिताला बाहेर काढण्यात आलं आणि ती वाइल्डकार्ड म्हणून परत आली तेव्हा टीना आणि श्रीजिता यांच्यात स्पर्धा दिसून आली. श्रीजिताने टीनाला काळ्या मनाची व्यक्ती असंही म्हटले. दोघांमध्ये तीव्र वैयक्तिक टीकाही झाल्या.

हिमांशी खुराना आणि शहनाज गिल : हिमांशी खुराणाने बिग बॉस 13 मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली होती. घराबाहेर हिमांशी आणि शहनाजमध्ये शत्रुत्व होते. यामुळे हिमांशी आत येताच शहनाजचा राग अजून वाढला होता. ती बिग बॉसवरही रागावली. एका टास्क दरम्यान हिमांशीने शहनाजला धक्का दिला. सलमानने यासाठी हिमांशीला फटकारले देखील होते.

हिना खान आणि शिल्पा शिंदे : बिग बॉस सीझन 11 मध्ये शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात खूप वाद झाले. दोघांनाही एकमेकांसमोरही यायला आवडत नव्हते. फॅमिली वीक दरम्यान जेव्हा हिनाचा बॉयफ्रेंड घरात आला तेव्हा हिना खूप रडली. त्या वेळी शिल्पाने तिची चेष्टाही केली होती. शिल्पा शिंदे त्या सीझनची विजेती होती.

तेजस्वी आणि शमिता शेट्टी : बिग बॉस सीझन 15 मध्ये शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात अनेक भांडणे झाली. एका टास्क दरम्यान शमिता करणला मसाज देत होती. त्यावेळी तेजस्वीला ते अजिबात आवडले नव्हते तेव्हा त्यांच्यात वाद झाले. तेजस्वी आणि शमिता यांच्यातील भांडणामुळे घरात अनेकदा गोंधळ उडायचा.

गौहर खान आणि तनिषा मुखर्जी : बिग बॉस 7 च्या संपूर्ण सीझनमध्ये गौहर खान आणि तनिषा मुखर्जी यांच्यात दुरावा होता. सीझनच्या शेवटपर्यंत दोघांनाही एकमेकांशी बोलणे आवडत नव्हते. दोघांनीही एकमेकांना अनेक वेळा वाईट बोलले होते. दोन्ही अभिनेत्री टॉप 2 मध्येही पोहोचल्या होत्या. अखेर गौहर खान त्या सीझनची विजेती ठरली होती.

रुबिना दिलीक आणि राखी सावंत : राखीने बिग बॉस सीझन 14 मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. सुरुवातीला राखी आणि रुबिना या चांगल्या मैत्रिणी होत्या, पण नंतर राखीने रुबिनाच्या पतीबद्दल विचित्र गोष्टी सांगायला सुरुवात केली. राखीचे अभिनवसोबतची मस्करी रुबिनाला अजिबात अवाडत नव्हती. अनेकदा सांगूनही राखीने तिचं वागणं न बदलल्याने रुबिना वैतागली. एका वादात तिने थेट बाथरूममध्ये जाऊन कपडे भिजवलेल्या बादलीतील पाणी राखीच्या अंगावर फेकलं. यासाठी सलमानने रुबिनाला फटकारलं होतं. तसेच या सीझनची विजेती रुबिना ठरली होती.