
अमरावती : विदर्भाचं काश्मीर म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. पावसाळा सुरु झाला की, पर्यटकांना हमखास चिखलदऱ्याची आठवण होते. गेल्या 15 महिन्यांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे.

या कोरोना संसर्गामुळे वर्ष लॉकडाऊमध्ये गेले आहे. काही दिवसांपूर्वी हे लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील झाले आहेत.

शनिवार-रविवारी चिखलदरा पर्यटन बंद असते, मात्र उर्वरित 5 दिवस पर्यटकांना मुभा आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

मात्र कोरोना अद्यापही गेलेला नाही, तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. पण पर्यटनस्थळावरील गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते.

दऱ्या-खोऱ्यात वसलेलं मेळघाट आता हिरवंगार झाले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी असलेलं धुकं आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.

मात्र कोरोना अजूनही गेला नाही हे पर्यटकांनी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

कोरोनाची कुठलीही भीती पर्यटकांमध्ये दिसत नाही. ना तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे.

त्यामुळे अशी पर्यटनस्थळं कोरोना उद्रेकाची केंद्र बनू नयेत, याची खबरदारी घेणं आवश्यक आहे.

चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी