
बॉलिवूडचे दिग्गज हीमॅन धर्मेंद्र आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची छाप उमटवली. त्यांच्या चित्रपटांपासून ते डायलॉगपर्यंत फॅन्समध्ये सर्वकाही फेमस आहे. धर्मेंद्र हे त्यांच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळे सुद्धा नेहमीच चर्चेत राहिले.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची सुंदर जोडी सगळ्यांना माहित आहे. ते त्यांचं दुसरं लग्न होतं. पहिलं लग्न त्यांचं 1954 साली प्रकाश कौर यांच्यासोबत झालेलं. त्यावेळी धर्मेंद्र फक्त 19 वर्षांचे होते. हे अरेंज मॅरेज होतं. लग्नानंतर त्यांना पहिल्या पत्नीपासून चार मुलं झाली. सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजीता.

चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर हेमा मालिनीवर ते फिदा झाले. त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न न मोडता हेमा मालिनी बरोबर दुसरं लग्न केलं. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न केलं. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सनी देओल 24 वर्षांचा होता. सनीला आपल्या वडिलांचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. सनी देओल इतका रागात होता की, त्याने हेमा मालिनी यांच्यावर हल्ला केल्याच बोललं जातं.

हा दावा खोडून काढताना प्रकाश कौरने सत्य काय ते समोर ठेवलं. स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या की, हे खरं नाहीय. सनीचा बचाव करताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक मुलाची इच्छा असते की, त्याच्या वडिलांनी त्याच्या आईवरच जास्त प्रेम करावं.

त्याच चर्चेमध्ये प्रकाश कौर यांनी मान्य केलं की, धर्मेंद्र यांनी नेहमीच दोन्ही पत्नींबद्दलची आपली जबाबदारी निभावली. प्रकाश कौर हेमा मालिनी बरोबर तुलना करताना म्हणाल्या की, कुठल्याही पुरुषाने माझ्यापेक्षा हेमाची निवड केली असती.