Assam Flood: आसाममध्ये पुराचा हाहाकार… ; 28 जिल्ह्यांतील 2930 गावांतील19 लाख बाधित

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आसाममधील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी फोन केला असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 18, 2022 | 3:37 PM
1 / 10

आसाम राज्यात मुसळधार पावसामुळे पूर आला असून  जनजीवन  विस्कळीत झाले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांतील 2930 गावांतील 19 लाख लोक पुरामुळे बेघर झाले आहेत.

आसाम राज्यात मुसळधार पावसामुळे पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांतील 2930 गावांतील 19 लाख लोक पुरामुळे बेघर झाले आहेत.

2 / 10

काल (शुक्रवार) पासून सुरु असलेल्या पावसात दोन मुलांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विभागाकडून राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3 / 10

आसामममधील पूरग्रस्त भागातील पुराच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत असून लोकांची घरे पाण्याखाली जात आहेत. राज्यातील परिस्थिती बिकट असून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे.

4 / 10

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आसाममधील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी फोन केला असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

5 / 10

या नैसर्गिक आपत्तीमुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली असून, पंतप्रधानांनी राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.असेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

6 / 10

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, दारंग जिल्ह्यातील सिपझार भागात पुरामुळे NH-15 पाण्याखाली गेला आहे. दारंग जिल्हा प्रशासनाने महामार्गावरील वाहनांची वाहतूक बंद केल्याने शेकडो ट्रक तेथे अडकून पडले आहेत.

7 / 10

दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर येऊन 13 बंधारे, 64 रस्ते आणि पूल खराब झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

8 / 10

मुसळधार पाऊस व पुरामुळे राज्यातील बजली जिल्हाला सर्वाधिक फाटका बसला आहे. येथील पुरामुळे एकूण 3.55 लाख लोक बाधित झाल्याची मी, माहिती समोर येत आहे

9 / 10

पूरग्रस्त भागातील एक लाखाहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. दुसरीकडे पुरामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

10 / 10

मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ईशान्य रेल्वेच्या लुमडिंग विभागातील जमुनामुख आणि जुगीजन विभागांदरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us