
शिवडी-न्हावा शेवा पूल म्हणजेच अटल सेतूच आज उद्गाटन होणार आहे. अवघ्या सात वर्षात बांधून तयार झालेला हा पूल उत्कृष्ट सिव्हिल इंजिनिअरींगचा नमुना आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक हा एकूण 21.8 किलोमीटर लांबीचा पूल आहे. या ब्रिजचा 16.50 किमीचा मार्ग समुद्रात आणि 5.5 किमीचा मार्ग जमिनीवर आहे. अटल सेतू हा 6 पदरी सागरी ब्रिज आहे.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या ब्रिजवरुन प्रवास करुन अनुभव घेणार आहेत. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासाच अंतर अवघ्या 20 मिनिटावर येणार आहे.

शिवडी-न्हावा शेवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर त्यावरुन दररोज 70 हजार वाहनांचा प्रवास सुरु होईल असा हा पूल बांधणाऱ्या MMRDA चा अंदाज आहे.

शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलामुळे वर्षाला 1 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याशिवाय CO2 इमिशन म्हणजे कार्बन उत्सर्जन 25 हजार मिलियन टनने कमी होणार आहे. हा एक प्रकारे पर्यावरणाचा फायदाच आहे.