GK : भारतातील अशी नदी जिचे अर्धे पाणी गोड आणि अर्धे खारट, नेमकं कारण काय?

Unique River : भारतात शेकडो नद्या आहेत, मात्र यातील काही नद्या एकदम अनोख्या आहेत. भारतात एक अशी नदी आहे जिचे अर्धे पाणी खारट आणि अर्धे पाणी गोड असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 23, 2026 | 10:51 PM
1 / 5
नदीचे नाव आणि अर्थ: या नदीचे नाव लूनी नदी असे आहे. हे नाव संस्कृत शब्द 'लवणवारी' वरून आले आहे, ज्याचा अर्थ 'खाऱ्या पाण्याची नदी' असा होतो. ही भारतातील एकमेव जादुई नदी आहे.

नदीचे नाव आणि अर्थ: या नदीचे नाव लूनी नदी असे आहे. हे नाव संस्कृत शब्द 'लवणवारी' वरून आले आहे, ज्याचा अर्थ 'खाऱ्या पाण्याची नदी' असा होतो. ही भारतातील एकमेव जादुई नदी आहे.

2 / 5
अर्धे पाणी गोड, अर्धे खारे: या नदीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे तिचे अर्धे पाणी गोड आहे आणि अर्धे खारे (खारट). एकाच नदीत असे दोन प्रकारचे पाणी असणे हे निसर्गाचे एक मोठे रहस्य मानले जाते.

अर्धे पाणी गोड, अर्धे खारे: या नदीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे तिचे अर्धे पाणी गोड आहे आणि अर्धे खारे (खारट). एकाच नदीत असे दोन प्रकारचे पाणी असणे हे निसर्गाचे एक मोठे रहस्य मानले जाते.

3 / 5
उगम : लूनी नदी राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील 'नाग' टेकड्यांमधून (अरवली पर्वतरांगा) उगम पावते. उगमस्थानापासून बाडमेर जिल्ह्यातील 'बालोतरा' या ठिकाणापर्यंत या नदीचे पाणी गोड असते. मात्र, बालोतराच्या पुढे गेल्यावर वाळवंटी भागातील मातीमधील क्षार आणि मीठ या पाण्यात मिसळते, ज्यामुळे ते खारट होते.

उगम : लूनी नदी राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील 'नाग' टेकड्यांमधून (अरवली पर्वतरांगा) उगम पावते. उगमस्थानापासून बाडमेर जिल्ह्यातील 'बालोतरा' या ठिकाणापर्यंत या नदीचे पाणी गोड असते. मात्र, बालोतराच्या पुढे गेल्यावर वाळवंटी भागातील मातीमधील क्षार आणि मीठ या पाण्यात मिसळते, ज्यामुळे ते खारट होते.

4 / 5
नदीचा प्रवाह: ही नदी राजस्थानमधील अजमेर, नागौर, पाली, जोधपूर, बाडमेर आणि जालोर या जिल्ह्यांतून सुमारे 495 किलोमीटरचा प्रवास करते.

नदीचा प्रवाह: ही नदी राजस्थानमधील अजमेर, नागौर, पाली, जोधपूर, बाडमेर आणि जालोर या जिल्ह्यांतून सुमारे 495 किलोमीटरचा प्रवास करते.

5 / 5
नदीचा शेवट: इतर नद्यांप्रमाणे ही नदी समुद्राला मिळत नाही. राजस्थानमधून वाहत जाऊन ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि कच्छच्या रणामधील दलदलीच्या भागात लुप्त होते.

नदीचा शेवट: इतर नद्यांप्रमाणे ही नदी समुद्राला मिळत नाही. राजस्थानमधून वाहत जाऊन ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि कच्छच्या रणामधील दलदलीच्या भागात लुप्त होते.

Follow Us