
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक कार्डधारकाला दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दोन ते तीन रुपयांच्या अत्यल्प किंमतीवर उपलब्ध करते. दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच बीपीएल कार्ड आणि अंत्योदय कार्डधारकांना सरकारकडून अधिक रेशन मिळते. अशा परिस्थितीत लोकं शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड बनवत असून सरकारही यासाठी पुढाकार घेत आहे.

तुम्हालाही रेशनकार्ड बनवायचे असेल किंवा कोणाचे नाव कार्डमध्ये घालायचे असेल तर बनावट कागदपत्रे वापरू नका अन्यथा ते तुम्हाला अडचणीचे ठरू शकते आणि तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.

अनेक लोक या सेवेच्या अटींची पूर्तता न करता या वर्गाचे रेशन कार्ड बनवतात. त्यासाठी ते बनावट कागदपत्रे सादर करतात किंवा इतर काही पद्धत अवलंबून त्यांना बीपीएल किंवा अंत्योदय रेशन कार्ड बनवतात.

बनावट पद्धतींचा वापर करणे किंवा बनावट रेशनकार्ड बनविणे हा अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहे, परंतु आता त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. बनावट रेशनकार्ड प्रकरणी कोणीही दोषी आढळल्यास त्याला पाच वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

आपल्याकडे रेशन कार्ड नसले तर आपण ते ऑनलाईन बनवू शकता. रेशन कार्ड ऑनलाईन बनवण्यासाठी प्रत्येक राज्याने एक खास वेबसाईट तयार केली आहे. आपण रहिवासी आहात त्या राज्याच्या वेबसाईटला भेट देऊन आपण यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचे नाव पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केले जाते. परंतु 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक स्वतःसाठी स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात.