वाढीव वीजबिल माफीसाठी मनसेने मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार झटका आंदोलन सुरू केलं आहे. | MNS Protest against Electricity Bills
Follow us
मुंबईत म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चासाठी मनसेने परवानगी मागतली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे सुरक्षेचं कारण सांगत पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली. पण, पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन देण्यास परवानगी दिली आहे.
नवी मुंबईतील कोकण भवन वर देखील मनसे तर्फे मोर्चा काढत वाढीव वीज बिलाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक वेळा निवेदन देऊन वीज बिल वाढी संदर्भातील सामान्य नागरिकांच्या भावना पोहचवून देखील सरकार फक्त आश्वासने देण्यात मग्न आहे. सरकारच्या या वेळ काढूपणा विरोधात सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हा संताप सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने वाढीव विजबिलांसंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतील बांद्रा येथे आंदोलन करण्यात आले. राज ठाकरेंच्या सहीचे निवदेन प्रशासनाला दिले.
पोलीस आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो आहे, आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
पनवेल: लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल माफ करा या मागणीसाठी मनसेनं पनवेलच्या शिवाजी चौकात आंदोलने केलं. जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचं करण्यात आले. पनवेल शहरात पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वात आंदोलन करणयात आले.
पुणे : वाढीव वीज बिलाच्या विरोधात पुण्यात मनसेने आयोजित केलेल्या यू टर्न मोर्चाला परवानगी नाकारत शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीस बजावल्या. त्यानंतर आक्रमक झालेल्या शहराध्यक्षांसह काही कार्यकर्त्यांना पोलीसांनी शनिवार वाड्यापासुन ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर इतर कार्यकर्त्यांनी थेट फरासखाना पोलीस स्टेशन गाठत, पोलीस स्टेशन बाहेरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली. मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी यावेळी उपस्थितांसमोर सरकारला इशारा दिला.
वर्धा: वीज बिल माफीसाठी वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात आलाय वर्धा जिल्हाधिकारी परिसरात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिलेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भात इतर जिल्ह्यातही वीजबिलांविरोधात आंदोलन करण्यात आले.