
रायगड जिल्ह्यातील महाड येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ‘चवदार तळे सत्याग्रहा’चे म्हणजेच क्रांती दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले.

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यातील पाणी पिऊन बहुजन समाजाला त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.

त्यासोबतच समाजात समतेचा संदेशही रुजवला. या घटनेची आठवण कायम रहावी यासाठी याठिकाणी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले.

याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, मा.आमदार रवींद्र फाटक, युवासेना कार्यकारिणी सदस्य विकास गोगावले, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, नागसेन कांबळे उपस्थित होते.