
इमानदार प्राणी कोणता? असा प्रश्न तुम्हाला जर कोणी विचारला तर लगेच तुम्ही सांगून मोकळं होता की जगातला सर्वात इमानदार प्राणी हा कुत्रा आहे.

जगातील असा एकही भाग नसेल जिथे तुम्हाला श्वान दिसणार नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला श्वान प्रेमी माणसं आढळून येतील. अनेक जण मोठ्या आवडीनं श्वान पाळतात.भटक्या कुंत्र्यांची संख्या देखील मोठी आहे.

पूर्वी शिकार आणि घराची राखण या दोन मुख्य कारणांसाठी प्रामुख्यानं कुत्रे पाळले जायचे. तर आता सुद्धा घराची राखण करण्यासाठी कुत्रे पाळले जातात. मात्र आता अनेक जण हौस म्हणून कुत्रे पाळू लागले आहेत.

जगात कुत्र्यांच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत, त्यातील अनेक प्रचंड महागड्या आहेत.दहा हजार रुपयांपासून ते काही लाखांपर्यंतची किंमत श्वान खरेदीसाठी मोजावी लागते.

कुंत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण राहावं, त्याचा उपद्रव नागरिकांना होऊ नये, म्हणून काही देशांमध्ये तर त्या संदर्भात कायदे देखील करण्यात आले आहेत.

मात्र तुम्हाला माहिती आहे का? की भारतामध्ये देखील असा एक भाग आहे, जिथे कुत्रा अजिबात आढळत नाही. तिथे जी श्वानांसाठी पॉलीस बनवण्यात आली, त्या पॉलिसीचा तो परिणाम आहे.

तुमची उत्सुकता अधिक न ताणता आता उत्तर जाणून घेऊयात, लक्षद्वीप असं याचं उत्तर आहे. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासीत प्रदेश आहे.तेथील सरकारकडून रेबीजला आळा घालण्यासाठी डॉग फ्री स्टेटची पॉलिसी तयार करण्यात आली आहे. टीप- सदरील माहितीबाबत टीव्ही 9 कोणताही दावा करत नाही, ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे.