Photo : परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील बीड दौऱ्यावर, गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडेंना आदरांजली

| Updated on: Sep 27, 2021 | 11:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्या निमित्त जयंत पाटील सध्या राज्याच्या विविध भागाच्या दौऱ्यावर आहेत. परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला गोपीनाथ गडावर जात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.

1 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्या निमित्त जयंत पाटील सध्या राज्याच्या विविध भागाच्या दौऱ्यावर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्या निमित्त जयंत पाटील सध्या राज्याच्या विविध भागाच्या दौऱ्यावर आहेत.

2 / 5
परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला गोपीनाथ गडावर जात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.

परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला गोपीनाथ गडावर जात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.

3 / 5
यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिल्याची माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.

यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिल्याची माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.

4 / 5
त्यानंतर गेवराईमध्ये पाटील यांनी परिवार संवाद यात्रेला संबोधित केलं. गेवराईची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल, अशी खात्री यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केलीय.

त्यानंतर गेवराईमध्ये पाटील यांनी परिवार संवाद यात्रेला संबोधित केलं. गेवराईची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल, अशी खात्री यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केलीय.

5 / 5
परिवार संवाद यात्रेत गेवराई हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे इतके चांगले नियोजन आहे. इथल्या बुथ अध्यक्षांच्या नियमित बैठका झाल्या आहेत. त्यांना नियमित कार्यक्रम दिले तर 2024 साली गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय.

परिवार संवाद यात्रेत गेवराई हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे इतके चांगले नियोजन आहे. इथल्या बुथ अध्यक्षांच्या नियमित बैठका झाल्या आहेत. त्यांना नियमित कार्यक्रम दिले तर 2024 साली गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय.