Daughters Day: स्नेहा दुबेच्या उत्तरानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची बोलती बंद, स्नेहाचं पुणे कनेक्शन नेमकं काय?
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना आरसा दाखवत स्नेहा दुबे म्हणाल्या की, जम्मू -काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि नेहमीच राहतील.
-
-
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. भारताने यावेळी पाकिस्तानचे बोलणेही बंद केले. जागतिक स्तरावर पाकिस्तानचा यामुळे पुन्हा एकदा अपमान झाला. भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे भारताच्यावतीने उत्तर देण्यासाठी समोर होत्या. त्यांनी काश्मीरवर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि बोलणे बंद केले. आज, कन्यादिनी, देशाला स्नेहा दुबे सारख्या मुलींचा अभिमान आहे.
-
-
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना आरसा दाखवत स्नेहा दुबे म्हणाल्या की, जम्मू -काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि नेहमीच राहतील. यामध्ये पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे. आम्ही पाकिस्तानला त्यांच्याकडे अवैधरित्या असणारे सर्व क्षेत्र रिकामे करण्याचे आवाहन करतो. UNGA मध्ये स्नेहाच्या या उत्तरानंतर #SnehaDubey हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला.
-
-
गेल्या काही वर्षांपासून असे दिसून आले आहे की भारत संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या तरुण अधिकाऱ्यांना संधी देत आहे. आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी स्नेहासाठी ही एक मोठी संधी होती. ती खूप मेहनत आणि समर्पणाने इथे पोहोचली आहे. स्नेहा दुबेने तिच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. स्नेहाला पहिल्यापासूनच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये खूप रस आहे. ती 2012 च्या बॅचची महिला IFS अधिकारी आहे.
-
-
स्नेहा दुबे यांचे बालपण झारखंडच्या जमशेदपूरमध्ये गेले. तिचा जन्म तिथेच झाला, जमशेदपूरमधील कंपनीत स्नेहाचे वडील केबल कंपनीत इंजिनिअर होते. त्याचे कुटुंब केबल टाऊनमध्ये राहत होते. परंतु वर्ष 2000 मध्ये कंपनी अचानक बंद झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब गोव्यात स्थलांतरित झाले. स्नेहाच्या वडिलांना फिनोलेक्स केबल कंपनीत नोकरी मिळाली, तिची आई देखील शिक्षिका आहे.
-
-
स्नेहाचे सुरुवातीचे शिक्षण गावातूनच झाले. यानंतर तिने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेली. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) एमए केले आणि नंतर तिथून एमफिल केले. तिनं पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, भारतीय परराष्ट्र सेवा विभाग निवडला. आयएफएस झाल्यानंतर तिची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली. यानंतर, 2014 मध्ये तिची माद्रिद येथील भारतीय दूतावासात नियुक्ती झाली. त्यानंतर काही वर्षांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या पहिल्या महिला सचिव म्हणून तिची नियुक्ती झाली.