Border Gavaskar Trophy : टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा किंग कोण?
Border Gavaskar Trophy Head To Head Record : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत दोघांपैकी कोणता संघ वरचढ राहिला आहे? जाणून घ्या

टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला 22 नोव्हेंबर सुरुवात होत आहे.

सलामीचा सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी या स्पर्धेच्या इतिहासात दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकलीय? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1996-1997 पासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. यंदाची ही या ट्रॉफी अंतर्गत 17 वी मालिका आहे.

टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफी दबदबा रहिला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला नमवत 10 वेळा ही ट्रॉफी अर्थात मालिका जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाला फक्त 5 वेळाच या स्पर्धेत मालिका विजय मिळवता आला आहे. तर एक मालिका बरोबरीत राहिली आहे.

टीम इंडियाने या स्पर्धेत गेल्या 10 वर्षात एकाहीत सत्ता राखली आहे. टीम इंडियाने सलग 4 वेळा कसोटी मालिका जिंकत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.

टीम इंडियासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. टीम इंडियाला सलग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे.