कागद ओला झाला की लगेच फाटतो, पण चलनी नोटांचं तसं होत नाही! कारण…
भारतात गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चलनी नोटा हल्ली खूपच कमी वापरल्या जातात. भारतात 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. या नोटा कागदाच्या बनवलेल्या असतात. पण तुम्ही एक गोष्ट पाहिली आहे का? साधा कागद ओला झाली की लगेच फाटतो किंवा लगदा होण्यास सुरुवात होते. तसं नोटांचं होत नाही. यामागचं कारण काय ते जाणून घेऊयात
1 / 5

2 / 5

आपण वापरत असलेल्या नोटांमध्ये 100 टक्के कापूस (कॉटन) वापरला जातो. हे आम्ही नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे.
3 / 5

कापसाचा वापर करण्याचं कारण असं की नोटा दीर्घकाळ टिकल्या पाहीजेत. इतकंच काय तर कॉटनच्या कागदावर प्रिंट करण्यासाठी विशिष्ट शाई वापरली जाते.
4 / 5

नोटांची प्रिंट करताना आरसीबीआय यावर काही सिक्युरिटसची फीचरचा वापरही करते. त्यामुळे या नोटांची हुबेहूब नकल करणं कठीण होतं. त्यामुळे खोट्या आणि खऱ्या नोटांमधील फरक लगेच कळतो.
5 / 5

दोन किंवा त्यापेक्षा अधिक नोटांवरील नंबर एकसारखा असू शकतो का? असा प्रश्नही अनेकदा समोर येतो. आरबीआयच्या बेवसाईटनुसार, नोटांवरील नंबर समान असू शकतो, पण त्यावरील इनसेट लेटर किंवा मुद्रण वर्ष किंवा गर्व्हनरची सही मात्र वेगळी असेल.
Follow Us