
टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 शतके केली गेली आहेत. मात्र भारतीय संघाविरूद्ध कोणालाही हा पराक्रम करता आला नाही. ख्रिस गेल याने 2010 मध्ये 98 धावा केल्या होत्या मात्र दोन धावा त्याच्या कमी पडल्या. गेल असा खेळाडू आहे ज्याने वर्ल्ड कप स्पर्धेत दोन शतके केली आहेत.

या यादीमध्ये फक्त एकाच भारतीय खेळाडूचा समावेश आहे. आतापर्यंत भारताच्या इतर कोणत्याही खेळाडूला शतक करता आलें नाही. ज्या खेळाडूने हे शतक केलंय तो आता निवृत्त झाला आहे.

भारताचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुरेश रैना आहे. रैनाने 2010 च्या T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावा केल्या होत्या. तेव्हापासून शतकाचा दुष्काळ आहे.

विराट कोहलीने 2016 च्या T20 विश्वचषकात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 89 धावा केल्या होत्या. मात्र त्याला शतक पूर्ण करता आलेलं नव्हतं.

दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कोणता खेळाडू ही कामगिरी करण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.