“जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा”, बावनकुळे यांचं शरद पवार यांना आवाहन

| Updated on: Nov 14, 2022 | 1:30 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हटलंय? पाहा...

जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा, बावनकुळे यांचं शरद पवार यांना आवाहन
Follow us on

पुणे : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने बावनकुळे यांचं निलंबन करायलाच हवं. अशा घटना होत राहतात असं बोलून चालणार नाही. आव्हाडांना आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो द्यावा. अजित पवार आणि शरद पवार आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल त्यांनी केलाय.

कुणी आव्हाड यांचं समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं, असंही बावनकुळे म्हणालेत.

पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये 60 वर्षे सत्ता केली. सरकार चालवलं. तर त्यांनी उपकार केले नाहीत. बारामतीत दहशत आहे. आता गेलेले शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमध्ये दहशत नव्हती. त्यांना शिंदेंचं नेतृत्व आवडलं त्यामुळे ते शिंदेंसोबत गेले, असं बावकुळे म्हणालेत.

शिंदे गट-भाजप सध्या एकत्र आहे. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूका लढवणार आहे, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

गजानन कीर्तिकर यांच्या शिंदेगटात प्रवेशावरून बावनकुळे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. कीर्तिकर यांनी शिवसेनेसाठी कष्ट घेतले. सेना घराघरापर्यंत पोहचवली. मग त्यांना ठाकरेगट का सोडावा लागला? उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चार लोक उरतील, असं बावनकुळे म्हणालेत.