‘जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा’, रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

| Updated on: Apr 08, 2021 | 10:54 PM

महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजप नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी आता धार पकडली आहे.

जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा, रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार
कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन तापलेलं राजकारण आता अधिक पेटण्याची चिन्ह आहेत. कारण महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजप नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी आता धार पकडली आहे. कोरोना लसीचं वितरण हे लोकसंख्येचा आधारावर नाही तर राज्यांच्या लसीकरणाच्या कामगिरीवर आधारित असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केलाय. (NCP MLA Rohit Pawar responds to Devendra Fadnavis’ allegations over vaccine shortage)

‘राज्यात 10 लाख डोस शिल्लक’

लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा 10% असू शकतो. पण आपण तो अवघा 3% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा. महाराष्ट्राला 1.6 कोटी डोस मिळाले असून आज संध्याकाळपर्यंत आपण दोन्ही डोस मिळून 93.32 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं तर ३ लाख डोस वाया गेले. आज आपल्याकडे 10 लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपतील.

#MaharashtraNeedsVaccine

लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत….

Posted by Rohit Rajendra Pawar on Thursday, 8 April 2021

 

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उत्तरं द्यावीत

आज काही ठिकाणी लसीचा साठा संपला. त्यामुळे लसीकरण ठप्प झालं. वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटात लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग अजून किती वाढवायचा? केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत!

‘संकट काळात तरी राजकारण करु नका’

केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत. संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!

फडणवीस काय म्हणाले?

“केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर! महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 26 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : लसीकरण केंद्र जाणिवपूर्वक बंद करुन चुकीच्या बातम्या पसरवण्याचं कारण काय? फडणवीसांचा सवाल

महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांची थेट मोदींकडे तक्रार? ठाकरे म्हणतात, समज द्या!

NCP MLA Rohit Pawar responds to Devendra Fadnavis’ allegations over vaccine shortage