शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच कारवाईला सुरुवात, नारायण राणेंचे बॅनर हटवले!

| Updated on: Aug 19, 2021 | 10:07 AM

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात होत आहे. मात्र या यात्रेवर पावसाचं सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे.

शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच कारवाईला सुरुवात, नारायण राणेंचे बॅनर हटवले!
Narayan Rane banners
Follow us on

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जन आशीर्वाद यात्रेला (BJP Jan Ashirwad Yatra) मुंबईतून सुरुवात होत आहे. मात्र या यात्रेवर पावसाचं सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच मुंबई मनपाने माहिम , शिवाजी पार्क भागात नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर हटवले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले.

नारायण राणे यांचं सकाळी 10 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन घालतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे.

नितेश आणि निलेश राणेंकडून आढावा

दरम्यान नारायण राणे यांच्या आगमनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नितेश आणि निलेश राणे हे मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रमोद जठार आणि कालीदास कोळंबकर हे देखील उपस्थित आहेत.

बाळासाहेब राष्ट्राचे नेते

बाळासाहेब हे कुण्या पक्षाचे नेते नसून सर्व राष्ट्राचे नेते आहेत. ठाकरे कुटुंबाने राणेंना स्मारकावर यायला विरोध केला नाही, शिवसेनेच्या इतर नेत्यांनी देखील मोठे मन करावे. 2024 मध्ये कोण किती पाण्यात आहे हे दिसेल, असं आव्हान भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिलं.

राणेंची जन आशीर्वाद यात्रा 

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागणार आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार का?

नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या  

नारायण राणे मुंबईत ‘जन आशीर्वाद’ मागणार, शिवाजी पार्कातही जाणार, शिवसेनेवर हल्लाबोल करणार?