Nawab Malik | घरुन उशी-गादी मागवली, ईडीच्या कोठडीत नवाब मलिकांची पहिली रात्र कशी गेली?

| Updated on: Feb 24, 2022 | 7:42 AM

हसीना पारकर यांच्याकडून नवाब मलिक यांच्या नावावर मालमत्ता वर्ग, यामुळं ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Nawab Malik | घरुन उशी-गादी मागवली, ईडीच्या कोठडीत नवाब मलिकांची पहिली रात्र कशी गेली?
नवाब मलिक
Follow us on

मुंबई – बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांची घरी चौकशी केली, काही गोष्टीत ईडीला (ED) शंका आल्याने त्यांना तात्काळ नवाब मलिकांना ताब्यात घेतलं आणि दुपारी कार्यालयात आणलं. इक्बाल कासकर (ekbal kaskar) यांन नाव घेतल्याने नवाब मलिकांना चौकशीसाठी बोलावण्यातं आलं होतं. पण बुधवारी सकाळी घरी मलिकांवरती कारवाई केली. त्यानंतर जे. जे रूग्णालयात तपासणी करण्यासाठी नेण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी ईडीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केल्याची पाहायला मिळाले. तसेच भाजप ईडीचा चुकीचा वापर करीत असून हे सुडाचं राजकारण करीत असल्याचा आरोप उपस्थित अनेक समर्थकांनी तिथं नोंदविला. अटक झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर आज महाविकास आघाडीतील अनेक नेते मंत्रायलय परिसरात धरणं आंदोलन करणार आहेत. भाजपचे नेते आज दिवसभरात नवाक मलिकांचा राजीनामा घ्यावा यासाठी आंदोलन करणार आहे. काल रात्री उशिरा इडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांना त्यांना पाठीबा त्रास असल्याने उशी-गादी देण्यात आली होती. तसेच त्याचे कुटुंबिय अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी अनेक ट्विट देखील केले आहेत.

महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन

नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर सकाळपासूनचं महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी काल मलिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन केलं, तर भाजपचं हे असलं कारण चुकीचं असल्याचं अनेकांनी ट्विट म्हणाले आहेत. अनेक नेत्यांनी आमचं सरकार पाडण्यासाठी चुकीच्या पध्दतीने प्रयत्न केले जात असल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे आज होणा-या घडामोंडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रालयाशेजारी असणा-या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ अनेक मंत्री धरणं आंदोलन करणार आहेत.

मलिकांना अटक केल्यानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना 93 च्या बॉम्बस्फोटप्रकरणात बळी गेलेल्या सगळ्यांना श्रध्दांजली अर्पण करीत मालिकांविरोधात निदर्शन करावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजप केंद्रीय यंत्रणा चुकीच्या पध्दतीने हाताळत असून नवाब मलिकांनी ती जमीन 22 वर्षापुर्वी घेतली असल्याचे भूजबळांनी सांगितले त्याचबरोबर भाजप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना अटक करण्यासाठी कोणतीही कारण शोधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील भाजपची सत्ता संविधानाचा उपयोग चुकीच्या पध्दतीने करीत असून हे कुठं तरी थांबलं पाहिजे यासाठी सुप्रिम कोर्टानं राजकीय वापर थांबवावा असं म्हणटलंय. नवाब मलिकांबाबत तुम्हाला अधिक माहिती कोर्टात मिळेल, राजकीय बदल्याची भावना यातून दिसून आल्याचे शिवसेने खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

कोर्टात काय झालं

मलिकांना अटक केल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला तर, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला असल्याचे पाहायला मिळाले. ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल केल्याचे अनिल सिंग यांच्याकडून कोर्टात सांगण्यात आले. हसीना पारकर यांच्याकडून नवाब मलिक यांच्या नावावर मालमत्ता वर्ग, यामुळं ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय, तसेच 55 लाखांची रक्कम यासाठी देण्यात आली होती. नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद केला, त्यानंतर त्यांना 3 मार्चनंतर ईडी कोठडी देण्यात आली.

भीषण VIDEO | कावड यात्रेला गाडीचा धक्का, यात्रेकरुंची चालकाला बेदम मारहाण, कारही फोडली

एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या विद्यार्थिनीची हत्या, ट्यूशनहून परतताना भररस्त्यात खून

Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्त्यांचं राज्यभरात आंदोलन