“आजूबाजूचे लोक उद्धवसाहेबांना भडकावताहेत, लवकरच सारं ठीक होईल”, सुहास कांदेंना विश्वास

| Updated on: Jul 01, 2022 | 12:50 PM

पोस्टवर उद्धव आणि आदित्य ठाकरेदेखील!

आजूबाजूचे लोक उद्धवसाहेबांना भडकावताहेत, लवकरच सारं ठीक होईल, सुहास कांदेंना विश्वास
Follow us on

मुंबई : सध्या राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fdanavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि फडणवीसांना फेसबुक पोस्टच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांच्या या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचेही फोटो पाहाया मिळत आहेत. या शिवाय नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी माननीय श्री.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री पदी माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..!”, असं सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

“आजूबाजूचे लोक उद्धवसाहेबांना भडकावताहेत”

“आजूबाजूचे लोक उद्धवसाहेबांना भडकावताहेत”, असं सुहास कांदे म्हणाले आहेत. याशिवाय 11 तारखेला कोर्टात जाण्याची वेळच येणार नाही. विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल आणि ते निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. त्यामुळे लवकरच सारं ठीक होईल”, असा विश्वास सुहास कांदेंनी व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा

पोस्टवर उद्धव आणि आदित्य ठाकरेदेखील!

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि फडणवीसांना फेसबुक पोस्टच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांच्या या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचेही फोटो पाहाया मिळत आहेत. या शिवाय नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांचे फोटो पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर शिवसेनेलाच नाहीतर राज्यातील सर्वच जनतेला आश्चर्याचा धक्का बसला होता. आता त्यानंतरही शिवसेनेच्या बाजूने एकही गोष्ट होताना पाहवयास मिळत नाही. पक्षाने निलंबन केलेल्या आमदारांना बहुमत चाचणीची परवानगी देऊ नका तसेच यावर तातडीने सुनावणी करण्याची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीट कोर्ट हे आपल्या निर्णयावर ठाम असून तातडीची सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या निलंबण प्रकरणी सुनावणी ही आता 11 जुलै रोजीच होणार आहे. शिवाय बहुमत चाचणी देखील ठरलेल्या वेळीच होणार आहे.