सकाळच्या प्रार्थनेदरम्यान या 5 गोष्टी टाळा,अन्यथा मिळतील अशुभ परिणाम

पूजा करताना आपल्याला काही नियम पाळणे गरजेचे असतात. विशेषत: सकाळच्या पूजेत किंवा प्रार्थनेवेळी काही चुका करणे टाळले पाहिजे. ज्यामुळे आपण केलेल्या पूजेचं चांगलं फळ आपल्याला मिळेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात.

सकाळच्या प्रार्थनेदरम्यान या 5 गोष्टी टाळा,अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
Avoid These 5 Mistakes During Morning pooja
Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao | Updated on: Sep 24, 2025 | 2:47 PM

सकाळी अंघोळ केल्यावर आपण देवासमोर हात जोडतो, प्रार्थना म्हणतो. काहीजण तर रोज विधीवत पूजाही करतात. पण एक गोष्ट आहे की
सकाळच्या प्रार्थनेदरम्यान किंवा पूजेदरम्यान काही चुका अजिबात होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अन्यथा त्या प्रार्थनेचे फळ मिळणार नाही.

मळलेले किंवा फाटलेले वस्त्र देवाला अर्पण करू नये

वास्तु आणि धार्मिक श्रद्धेनुसार, देवाला मळलेले किंवा फाटलेले कपडे अर्पण करणे अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घराच्या सुख-समृद्धीवर परिणाम होतो. नेहमी स्वच्छ, नवीन आणि रंगीत कपडे अर्पण करा. यामुळे सकारात्मकता वाढते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.

जमिनीवर दिवा लावू नका

पूजेतील दिवा सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले. वास्तुनुसार तो नेहमी ताट, किंवा एखाद्या स्टँडवर लावा. थेट जमिनीवर दिवा लावल्याने दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा येते. तूप किंवा तिळाचे तेल वापरणे शुभ मानले जाते. तसेच नेहमी दिवा पूर्वेकडे ठेवावा.

तुटलेले तांदूळ वापरू नका

सकाळच्या पूजेत अक्षता म्हणून तांदूळ नक्की वापरा पण ते तांदूळ तुटलेले नसावे. कधीही अखंड तांदूळच अक्षता म्हणून घ्यावेत. तुटलेले तांदूळ अर्पण केल्याने पूजेची प्रभावीता कमी होते आणि नकारात्मकता वाढते. नेहमी संपूर्ण, स्वच्छ तांदूळ वापरा. ​​ते गंगाजलाने शुद्ध करा.

वाळलेली फुले अर्पण करू नका

वास्तुशास्त्रानुसार, देवतांना फक्त ताजी, सुगंधित फुले अर्पण करावी. वाळलेली किंवा शिळी फुले अशुभ असतात आणि नकारात्मक ऊर्जा आणतात. गुलाब, चमेली किंवा कमळ यांसारखी फुले निवडा. सकाळी लवकर फुले निवडा, त्यांना गंगाजलाने शुद्ध करा आणि मगट पूजेमध्ये वापरा.

दुसऱ्या दिव्याचा दिवा लावू नका

धार्मिक श्रद्धेनुसार पूजा दिव्यापासून दुसरा दिवा लावणे अशुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वास्तुदोष वाढतात. दिवा पूर्व किंवा ईशान्य दिशेने ठेवणे शुभ मानले जाते.

प्रार्थनास्थळाची स्वच्छता

वास्तुनुसार, तुमचे पूजास्थान स्वच्छ आणि व्यवस्थित असणे फार गरजेचे आहे. घाण, तुटलेल्या वस्तू किंवा विखुरलेली फुले ,वस्तू त्याच्या आजूबाजुला असणे नकारात्मक ऊर्जा आणते. स्वच्छतेमुळे पूजेचा प्रभाव वाढतो आणि शांती राखली जाते.

पूजेचे नियम म्हणजे आनंद आणि समृद्धीचा आधार

सकाळच्या प्रार्थनेदरम्यान स्वच्छ कपडे, संपूर्ण तांदळाचे दाणे, ताजी फुले, योग्य दिवा वापरा आणि स्वच्छता राखा. या पाच चुका टाळल्याने नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. तुमच्या घरात शांती, समृद्धी आणि आनंदी वातावरण राखण्यासाठी वास्तु तत्वांचे पालन करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us