Chanakya Niti | या 3 प्रकारच्या लोकांपासून जरा लांबच राहा, नाहीतर आयुष्य फक्त नकारात्मक होईल

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात तीन प्रकारच्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. असे लोक केवळ स्वतःच नकारात्मक नसतात, तर ते तुमच्यात नकारात्मकतेने भरतात. त्यांच्याबद्दल येथे जाणून

Chanakya Niti | या 3 प्रकारच्या लोकांपासून जरा लांबच राहा, नाहीतर आयुष्य फक्त नकारात्मक होईल
chankaya niti
| Updated on: Feb 18, 2022 | 8:47 AM

मुंबईआचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे एक कुशल अर्थतज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांना (Problem) समोरे गेले. पण त्यांनी प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याबरोबरच त्या परिस्थितीला आपली ताकद बनवली. आचार्य यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असा अनुभव होता की ते कोणत्याही परिस्थितीचे अगोदरच आकलन करत असत. आचार्य यांनी त्यांच्या अनुभवांचे सार चाणक्य नीती या पुस्तकात लिहिले. जेणे करुन लोकांना काही त्रास झाल्यास त्यांना त्यांच्या समस्येचे उत्त्र चाणक्या नीती (Chankaya Niti) मध्ये मिळेल. आचार्यांनी दिलेली शिकवण जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती सर्व अडचणींपासून मार्ग काढू शकते. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी तीन प्रकारच्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा लोकांपासून दूर राहिल्यास तुमच्या आयुष्यात कधीही नकारात्मकता येणार नाही येणार नाही असे आचार्यांनी सांगितले होते. आचार्य चाणक्यांनी श्लोकांच्या माध्यमातून तीन प्रकारच्या लोकांना टाळण्याचा सल्ला दिला आहे.

जाणून घ्या काय आहे तो श्लोक

मूर्खशिष्योपदेशेन दुष्टस्त्रीभरणेन च दुःखितैः सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति

मूर्ख व्यक्तीशी जास्त बोलू नका

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की एखाद्याने मूर्ख व्यक्तीशी कधीही जास्त बोलू नये किंवा त्याने जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही त्याला कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तो नेहमी स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. अशा स्थितीत तुमची ऊर्जा वाया जाईल, तसेच तुमच्यामध्ये नकारात्मकता, राग आणि चिडचिड निर्माण होईल.

दुष्ट स्त्रीवर दया करू नका

चाणक्य नीतीनुसार, इतरांना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु दुष्ट स्त्री जी इतरांसाठी चुकीचे विचार ठेवते. अशा स्त्रीमुळे घरातील त्रास वाढतो. जर तुम्ही त्यांच्यावर दया केली तर ते तुमच्या मदतीचा फायदा घेऊ शकतात आणि इतरांचे नुकसान करू शकतात.

देवाची निंदा करणाऱ्यापासून दूर राहा

जी व्यक्ती नेहमी दुःखात बुडालेली असते, प्रत्येक गोष्टीत नशीबाला आणि देवाला दोष देत असते, त्यांनी अशा लोकांपासून दूर राहावे. असे लोक कधीच स्वतःवर समाधानी नसतात आणि इतरांनाही समाधानी होऊ देत नाहीत.

संबंधीत बातम्या :

स्वामी विवेकानंदांचे गुरु, मानवतेची शिकवण देणारे स्वामी रामकृष्ण परमहंस

18 February 2022 Panchang | 18 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या शुक्रवारचे पंचांग

Body Moles Indication : चेहऱ्यावरील तीळ सांगतात तुमच्या आयुष्यातील अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या नशीबाबद्दल