
मुंबई : हिंदू धर्मात सूर्य ग्रहाची (Sun in kundali) देवता म्हणून पूजा केली जाते. सूर्य ही एकमेव देवता आहे जी नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष रूपाने दर्शन देते. माणसाच्या आयुष्यात सूर्य ग्रहाचे मोठे योगदान असते. असे मानले जाते की पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीला जीवनात खूप यश आणि प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि आदर वाढतो. पण सूर्याला जल देण्याचे काही नियम आहेत. या नियमांचे पालन केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे योग्य नियम.
रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने शरीरात ऊर्जा वाढते. त्याचबरोबर सूर्याला रोज अर्घ्य दिल्याने आत्मशुद्धी होते आणि शक्ती मिळते. त्याचबरोबर सूर्याच्या कृपेमुळे समाजात मान-सन्मान वाढतो.
रविवारी जल अर्पण करताना सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते. सूर्याच्या या मंत्रांचा जप केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. येथे सूर्य देवाचे काही चमत्कारिक मंत्र आहेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)