Janmashtami 2021 | श्रीकृष्णाला मोरपीस आणि बासरी इतकी प्रिय का? जाणून घ्या यामागील कारण…

| Updated on: Aug 28, 2021 | 8:18 AM

श्रीकृष्णाचे रुप देखील शास्त्रात अतिशय आकर्षक असे वर्णन केले आहे. असे मानले जाते की कृष्ण हातात बासरी आणि डोक्यावर मोरपीस धारण करत असे. गाय त्यांना अत्यंत प्रिय होती आणि ते ब्रजमधील सर्व ग्वालांसोबत गायींना चरायला न्यायचे. श्री कृष्णाला माखनचोर असेही म्हणतात कारण त्यांना माखन म्हणजेच लोणी आणि मिश्री खूप आवडायची

Janmashtami 2021 | श्रीकृष्णाला मोरपीस आणि बासरी इतकी प्रिय का? जाणून घ्या यामागील कारण...
Lord-Krishna
Follow us on

मुंबई : 30 ऑगस्टला श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण आहे. असे मानले जाते की या दिवशी श्री कृष्ण भगवान विष्णूच्या आठव्या अवताराने पृथ्वीवर जन्म घेतला होता. दरवर्षी जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. श्रीकृष्णाच्या महिमेबद्दल शास्त्रात बरेच काही सांगितले गेले आहे. छोट्याशा कान्हापासून द्वारकाधीश होण्यापर्यंत त्याच्या अनेक लीलांचे वर्णन केले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात, श्री कृष्णाची कोणतीही लीला सामान्य नव्हते, त्याच्या प्रत्येक लीलेमागे काही हेतू दडलेला होता.

श्रीकृष्णाचे रुप देखील शास्त्रात अतिशय आकर्षक असे वर्णन केले आहे. असे मानले जाते की कृष्ण हातात बासरी आणि डोक्यावर मोरपीस धारण करत असे. गाय त्यांना अत्यंत प्रिय होती आणि ते ब्रजमधील सर्व ग्वालांसोबत गायींना चरायला न्यायचे. श्री कृष्णाला माखनचोर असेही म्हणतात कारण त्यांना माखन म्हणजेच लोणी आणि मिश्री खूप आवडायची आणि लहानपणी तो मडकं फोडल्यानंतर लोणी चोरुन खायचा. श्री कृष्णाच्या आवडत्या गोष्टी आणि त्याच्या लीलांमागील लपलेला उद्देश जाणून घेऊया –

बासरी

भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय होती आणि तो प्रेमात मग्न झाल्यानंतर इतकी गोड वाजवत असत की बासरीचा सूर ऐकून लोक त्यात मग्न होऊन जायचे. पण प्रत्यक्षात श्रीकृष्णाची बासरी वाजवण्याचा हेतू काही औरच होता. वास्तविक, बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे, याचा अर्थ असा की परिस्थिती कशीही असो, आपण नेहमी आनंदी रहावे आणि आपले मन आनंदी ठेवून इतरांमध्ये आनंद वाटावा. ज्याप्रमाणे कान्हा स्वतः बासरी वाजवून आनंदी असायचा आणि इतरांना आनंद द्यायचा.

याशिवाय, बासरीचे तीन गुण आहेत ज्यातून प्रत्येकाने शिकले पाहिजे. पहिले म्हणजे बासरीत कुठलीही गाठ नसते. याचा अर्थ असा आहे की, नक्कीच चुकीचा विरोध करा, पण कोणाबद्दलही तुमच्या मनात काही ठेवू नका, म्हणजे सूडाची भावना बाळगू नका. दुसरं असं की जेव्हा तुम्ही बासरी वाजवाल तेव्हाच ती वाजेल, याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला सल्ला मागितला जाईल तेव्हाच द्या, फालतू बोलून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तिसरं म्हणजे जेव्हाही बासरी वाजते तेव्हा ती मधुरच असते. याचा सरळ अर्थ असा की जेव्हाही तुम्ही बोलाल तेव्हा वाणी इतकी गोड असावी की त्याने लोकांच्या मनाला आकर्षित केलं पाहिजे.

मोरपीस

मोराच्या पंखांमध्ये अनेक प्रकारच्या रंगांचा समावेश असतो. हे रंग जीवनाच्या परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. मोराच्या पंखांचा गडद रंग दुःख आणि अडचणींचे प्रतीक आहे, फिकट रंग आनंद, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की आयुष्यात सुख आणि दुःख दोन्हीमधून जावे लागते. परंतु दोन्ही परिस्थितींमध्ये ते समान राहिले पाहिजे. याशिवाय मोर हा एकमेव प्राणी आहे जो आयुष्यभर ब्रह्मचर्याचे व्रत पाळतो. प्रेमाबरोबरच तो स्वतःमध्ये आनंदी असतो. अशा स्थितीत मोरपीस शुद्ध प्रेमात ब्रह्मचर्याची महान भावना प्रतिबिंबित करतात.

गाय

श्रीकृष्णाला गाय खूप प्रिय होती. कारण गाय ही गुणांची खाण मानली जाते. गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप यांना पंचगव्य म्हणतात. या सर्व गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगल्या मानल्या जातात. तर पंचगव्य पूजेमध्ये सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते. हे सर्व असूनही, गाय किती उदार आहे. श्री कृष्णाचे गायीवरील प्रेम हे शिकवते की तुम्ही आयुष्यात कितीही उच्च पदावर असलात तरीही तुम्ही कितीही सद्गुणी असाल पण अहंकाराला तुमच्या व्यक्तिमत्वात येऊ देऊ नका. नेहमी उदार रहा आणि इतरांना प्रेम द्या.

माखन मिश्री

बालपणात श्रीकृष्ण लोणी चोरुन खायचे. किंबहुना तो अन्यायाविरुद्धचा त्यांचा निषेध होता. किंबहुना, त्यावेळी कंस लोकांवर अत्याचार करण्यासाठी कर स्वरूपात दुध, लोणी, तूप वगैरे भरपूर गोळा करायचा. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी, श्री कृष्ण, त्यांच्या गोरक्षकांसह लोणीचे भांडे फोडून सर्व ग्वालांसह एकत्र खात असत. कारण, ते ब्रजच्या लोकांना लोकांच्या कष्टाचे हक्क मानत असत. या व्यतिरिक्त, साखरेमध्ये एक गुण आहे की जेव्हा ते लोणीमध्ये मिसळले जाते, तेव्हा त्याची गोडी लोणीच्या प्रत्येक कणापर्यंत पोहोचते. आपण आपले वर्तन साखरेसारखे बनवले पाहिजे की जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा आपण आपले गुण त्या व्यक्तीला द्यावे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Janmashtami 2021 : हजार एकादशी समान आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत, जागरण, भजन केल्याने मिळतात अनंत लाभ

Krishna janmashtami 2021 : कान्हाच्या मुरलीमध्ये दडली आहेत अनेक रहस्ये, जाणून घ्या भगवान श्रीकृष्णाशी संबंधित गोष्टींचे धार्मिक महत्त्व