भारतातल्या या ठिकाणी आहे मोक्षाचे द्वार, याचा रावणाशी आहे थेट संबंध

भगवान शिवाला समर्पित, पश्चिम घाटावरील हे 1500 वर्षे जुने मंदिर कर्नाटकातील सात मोक्षस्थानांपैकी एक आहे. येथे स्थापित सहा फूट उंचीच्या शिवलिंगाचे नुसते दर्शन केल्याने पुण्य मिळते अशी मान्यता आहे.

भारतातल्या या ठिकाणी आहे मोक्षाचे द्वार, याचा रावणाशी आहे थेट संबंध
गोकर्ण
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 01, 2023 | 5:13 PM

मुंबई : गोकर्ण हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील मंगळुरूजवळ वसलेले गाव आहे. हिंदू धर्मीय लोकांची या स्थानावर अतूट श्रद्धा आहे. असे म्हणतात की, गोकर्ण (Gokarna) तिन्ही लोकांसाठी प्रसिद्ध आहे.  पुराणात या तीर्थक्षेत्राला ‘मोक्षाचे द्वार’ (Moksha Dwar) म्हटले आहे. धार्मिक श्रद्धेमुळे या ठिकाणाला ‘दक्षिणेची काशी’ असेही म्हणतात. या क्षेत्रामध्ये सर्व देवता, ऋषी, गंधर्व, मानव, भूत, पिशाच, सर्प इत्यादी भगवान शंकराची पूजा करतात. येथे तीन रात्री उपवास करून भगवान शंकराची आराधना करणार्‍याला दहा अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते, असे सांगितले जाते. जो येथे बारा रात्री उपवास करतो तो त्याला मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे.

गोकर्णाचे महत्व

गोकर्णाचे महाबळेश्वर मंदिर हे येथील सर्वात जुने मंदिर आहे. भगवान शिवाला समर्पित, पश्चिम घाटावरील हे 1500 वर्षे जुने मंदिर कर्नाटकातील सात मोक्षस्थानांपैकी एक आहे. येथे स्थापित सहा फूट उंचीच्या शिवलिंगाचे नुसते दर्शन केल्याने पुण्य मिळते अशी मान्यता आहे. येथे पूजा केल्याने ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळते. सर्व तीर्थांची यात्रा करूनही इच्छाकुवंशाचा राजा मित्राह ब्रह्मत्यापासून दूर गेला नाही, तेव्हा गौतममुनींच्या आज्ञेने तो येथे आला, असा उल्लेख शिवपुराणात आहे.

गाईच्या कानातून या ठिकाणी भगवान शिवाचा जन्म झाला होता, म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात. तसेच एका मान्यतेनुसार गंगावली आणि अघनशिनी नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावाचा आकारही कानासारखा आहे.

असे म्हणतात की, भगवान शिवाने हे शिवलिंग रावणाला त्याच्या साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी दिले होते, परंतु भगवान गणेश आणि वरुण देवतेने काही युक्तीने येथे शिवलिंग स्थापित केले. सर्व प्रयत्न करूनही रावणाला ते लंकेत नेता आले नाही. तेव्हापासून येथे भगवान शिवाचा वास असल्याचे मानले जाते.

गोकर्णातील आणखी एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे गणपतीला समर्पित असलेले महागणपती मंदिर. गणेशजींनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती, त्यामुळे त्यांच्या नावाने हे मंदिर बांधण्यात आले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)