नवी मुंबईत साकारणार तिरुपती वेंकटेश्वराचं मंदिर, राज्य सरकारने दिला 10 एकरचा भूखंड

| Updated on: Apr 21, 2022 | 1:03 PM

नवी मुंबईतील (Navi Mumbai) उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

नवी मुंबईत साकारणार तिरुपती वेंकटेश्वराचं मंदिर, राज्य सरकारने दिला 10 एकरचा भूखंड
tirupati
Follow us on

मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. शहर पातळीवरील सुविधा म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 येथे जमीन देण्यात येणार आहे. त्यानुसार उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 (एकूण क्षेत्र 40,400 चौ.मी.) 1.00 चटईक्षेत्र निर्देशांकासह एक रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने भाडेपट्टयाने (lease) थेट वाटप करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

शहर पातळीवरील सुविधा

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन एक विशेष बाब म्हणून हा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

वेंकटेश्वर मंदिराची माहिती

तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपती मध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. सण उत्सवाला येथे भाविकांच्या रांगा लागतात. कार्तिक पोर्णिमा निमीत्त अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. हे मंदिर भारतातील सर्वत श्रींमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.

संबंधीत बातम्या

Sunday Remedies: रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता

Jyotish tips: सुख म्हणजे नक्की काय असतं?, चार गोष्टी टाळल्या की ते घर बसल्या मिळतं!

केशरशी संबंधित हे उपाय करा, समस्या तर दूर होतीलच पण आयुष्य ‘धन’ धनाधन धन होईल!