Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा

| Updated on: Feb 12, 2024 | 7:48 PM

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते.

Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा
कलियुग
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : वेदानुसार हिंदू धर्मात चार युगे मानली जातात. पहिले सतयुग, दुसरे त्रेतायुग ज्यामध्ये भगवान विष्णूने रामाच्या रुपात अवतार घेतला, तिसरा द्वापारयुग ज्यामध्ये भगवान विष्णू कृष्णाच्या रुपात अवतरले आणि चौथे आणि शेवटचे युग हे कलियुग (Kaliyug) मानले जाते. जे सध्या सुरू असल्याचे मानले जात आहे. कलियुग हे चार युगांपैकी सर्वात लहान मानले जाते. मान्यतेनुसार, सर्वात जास्त अनीति, अन्याय, हिंसा आणि पापं कलियुगातच होतात. पण मग कलियुग हे चार युगांपैकी श्रेष्ठ का मानले गेले? यामागे एक रंजक कथा आहे, चला जाणून घेऊया.

कलियुगशी संबंधित कथा?

विष्णु पुराणानुसार, एकदा ऋषी आपापसात चर्चा करत होते की चार युगांपैकी सर्वोत्तम युग कोणते आहे. या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी मते होती, त्यामुळे ही चर्चा वादाचा विषय बनली आणि कोणताही तोडगा निघू शकला नाही, मग या वादाचे निराकरण करण्यासाठी सर्व ऋषी महर्षी व्यासांकडे गेले. महर्षी व्यास यांना वेदांचे जनक मानले जाते.

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते. त्रेतायुगात हे पुण्य उपासना, जप, तपश्चर्या आणि उपवासाने प्राप्त होते आणि द्वापर युगात तेच पुण्य केवळ एक महिन्याच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते, तर कलियुगात तेच पुण्य केवळ एका दिवसाच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते. ,म्हणूनच महर्षी व्यास म्हणतात की कलियुग हे चार युगांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्यामध्ये फक्त एका दिवसाच्या भक्तीने 10 वर्षांचे पुण्य मिळवता येते. तेव्हापासून कलियुग हे सर्वश्रेष्ठ युग मानले जाते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)