Ram Mandir : भारतातल्या या ठिकाणी आहे त्रेता युगातले सरोवर, जेथे कावळ्याने गरूडाला ऐकवली होती रामायणातील कथा

Ram Mandir पौराणिक ग्रंथांमध्ये लोमेश ऋषींच्या शापामुळे काकभुशुंडी कावळा झाला, त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कावळ्याच्या रूपात व्यतीत केले, असा उल्लेख आहे. वाल्मिकींच्या आधीही काकभुशुंडीने गरुडाला रामायणाची कथा सांगितली होती असे म्हणतात. असे म्हणतात की, मेघनादाशी जेव्हा राम युद्ध करत होते, तेव्हा प्रभू रामाला नागाने बांधले होते, तेव्हा गरुडाने रामाला मुक्त केले होते.

Ram Mandir : भारतातल्या या ठिकाणी आहे त्रेता युगातले सरोवर, जेथे कावळ्याने गरूडाला ऐकवली होती रामायणातील कथा
काकभुशुंडीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 1:33 PM

मुंबई : अयोध्येत रामललाच्या (Ramlala Ayodhya) प्राणप्रतिष्ठा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. या निमित्ताने आज आपण अशाच एका तलावाची माहिती जाणून घेणार आहोत, जिथे एका कावळ्याने गरूडाला रामायणाची कथा सांगितली होती. ज्याबद्दल तुम्हीसुद्धा क्वचितच ऐकले असेल.  मान्यतेनुसार भारतातील उत्तराखंडमध्ये त्रेता युगातील एक सरोवर आहे, जिथे प्रत्येक कणात काही ना काही रहस्य दडलेले आहे. उत्तराखंडमध्ये अजूनही उंच पर्वत आणि शिखरांसह अनेक रहस्यमय ठिकाणे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक काकभूशुंडी तलाव आहे ज्यामध्ये अनेक रहस्ये आहेत. तेथील स्थानिक लोकांमध्ये या तलावावर प्रचंड श्रद्धा आहे. आता ते पर्यटन स्थळ बनले आहे. या तलावात पर्यटक स्नानासाठी येताना दिसतात.

काकभुशुंडी तलाव हे प्राचीन काळापासून पवित्र असल्याचे मानले जाते. त्रेतायुगाशी संबंधित या सरोवराविषयी अनेक रहस्य आणि धार्मिक श्रद्धा आहेत. त्यामुळेच या तलावावर स्थानिक लोकांची मोठी श्रद्धा असून लोकं पापमुक्त होण्यासाठी येथे स्नान करण्यासाठी येतात.

रामायणाशी संबंधित आहे हे रहस्य

हा काकभुशुंडी तलाव आजही सर्वात खास मानला जातो, कारण त्याचा इतिहास रामायण काळाशी संबंधित आहे.असे मानले जाते की रामायणातील एक पात्र काकभुशुंडीने कावळ्याचे रूप घेऊन येथे रामायण कथा गरुडाला सांगितली होती. या कारणास्तव हा तलाव अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की येथे स्नान केल्याने लोकांचे पाप धुतले जातात आणि त्यांचे पुण्य वाढते.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या काय आहे पौराणिक कथा?

पौराणिक ग्रंथांमध्ये लोमेश ऋषींच्या शापामुळे काकभुशुंडी कावळा झाला, त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कावळ्याच्या रूपात व्यतीत केले, असा उल्लेख आहे. वाल्मिकींच्या आधीही काकभुशुंडीने गरुडाला रामायणाची कथा सांगितली होती असे म्हणतात. असे म्हणतात की, मेघनादाशी जेव्हा राम युद्ध करत होते, तेव्हा प्रभू रामाला नागाने बांधले होते, तेव्हा गरुडाने रामाला मुक्त केले होते. त्यावेळी गरुडाला आपणच देव असल्याचे समजले, जेव्हा ते ब्रह्मदेवाकडे हे जाणून घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी गरुडाला भगवान शिवाकडे पाठवले आणि तेथून भगवान शिवाने गरुडाला काकभुशुंडीला पाठवले. मग गरुडाला रामायण कथेची माहिती काकभूशुंडीच्या माध्यमातून मिळाली.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.